महाराष्ट्रातील एजंटामार्फत बँकॉकच्या नोकरीसाठी झाली होती अनेकांची निवड:नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाण्याचे तरुणही माफियांच्या जाळ्यात
नोकरीच्या निमित्ताने बँकॉकला नेऊन तिथून तरुणांना म्यानमार सीमेवर ओलीस ठेवले जात असल्याचा प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर आला आहे. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारी करून घेतली जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एजंटांमार्फत बीडसह नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाणे येथील तरुणांची नोकरीसाठी निवड झाली होती. नंतर या तरुणांना म्यानमार सीमेवर नेऊन डांबण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांतील तरुणांचीही…