Headlines

एसटी कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा:महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिणे, रोख रक्कम सुखरूप परत‎

प्रवाशांकडून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीबाबत तक्रारी होत असताना, अंजनगाव सुर्जी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. परतवाडा आगाराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम हरवली होती. मात्र, वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे हा मौल्यवान ऐवज महिलेला सुखरूप परत मिळाला. १०…

Read More

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….

Read More

बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेत महिलांचा सहभाग वाढला:पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन, बचतगटांना अनुदानाचे वितरण‎

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारीशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून, बचतगट व ‘उमेद’ अभियानाला शासनाचे भक्कम पाठबळ आहे. येणाऱ्या काळात उमेद अभियानाचा प्लॅटफॉ . ‘लखपती दीदी’ निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये एकल महिलांसाठी सुरू झालेली चळवळ…

Read More

बार्शीतील प्रलंबित 2457 प्रकरणे निकाली; 2 कोटींचा महसूल जमा:राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी 78 तर दाखलपूर्व 2379 प्रकरणात तडजोड‎

बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली…

Read More

वेरूळ येथील चतुर्विधा मठाला संरक्षण द्यावे:सहायक पोलिस अधीक्षक अग्निहोत्री यांना निवेदन‎

वेरूळ येथे श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणकाळात त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. त्यांच्या स्मरणार्थ वेरूळ येथे चतुर्विधामठ स्थापन करण्यात आला. आठशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठावर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महानुभाव पंथाच्या वतीने सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री…

Read More

दौंड-मनमाड रेल्वे मार्गासाठी 15 मीटर जागेचे संपादन:मनमाड शहरातील 1200 रहिवाशांना दिलासा‎

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मनमाड शहरातील सर्व्हे नंबर २५५ आणि २५६ मधील शेकडो घरे व दुकाने जमीनदोस्त होणार, या चर्चेने महिन्याभरापासून हजारो नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, सोमवारी रेल्वे प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या सर्व चर्चा फोल ठरल्या आहे. रेल्वे केवळ १५ मीटर जागा संपादित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंड-मनमाड…

Read More

उंडणगाव येथे ध्वजारोहणाने बालाजी उत्सवास सुरुवात:विधिवत केली पूजा, टाळ-मृदंगाच्या निनादात गाव भक्तिरंगात, हजार भाविकांनी केले टक्कल‎

गावातील ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या वार्षिक उत्सवाला अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. व्यंकटरमण “गोविंदा… गोविंदा… जय बालाजी महाराज”च्या जयघोषात मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वज उभारण्यात आला. ११ दिवस चालणाऱ्या भव्य उत्सवाची सुरुवात झाली. . या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुराणकाळापासून चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक परंपरांचे आजही गावकरी अत्यंत श्रद्धेने पालन करतात. उत्सव काळात गावातील पुरुष…

Read More

पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कंपनीतील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात केमिकल उडाले. ते कामगार स्वामी कणसे…

Read More

‘गदिमां’चे घर विकण्यावरून ‘रामायण’:ग. दि. माडगूळकरांच्या सूनबाई, नातवात आराेप-प्रत्याराेप

रामायणाची रचना गीतरूपात करून जगभरातील रामभक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे आधुनिक वाल्मीकी, दिवंगत कवी गदिमा ऊर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या मालमत्तेवरून त्यांच्याच कुुटुंबात ‘रामायण’ घडत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील त्यांचे निवासस्थान ‘पंचवटी’ पाडून ती जागा बिल्डरला देण्याचा वाद पेटला आहे. यात गदिमांच्या सूनबाई शीतल श्रीधर माडगूळकर आणि नातू सुमित्र यांनी सोशल मीडियावरून परस्परांवर गंभीर आराेप केले…

Read More

आता 1.77 कोटी बहिणीच लाडक्या!:‘फिल्टर’ प्रक्रियेद्वारे राज्याच्या तिजोरीवरील वार्षिक 10 हजार कोटींचा भार वाचला

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी प्रशासकीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रशासनाच्या कठोर छाननीमुळे तब्बल ६६ लाख बोगस आणि अपात्र अर्ज कायमचे बाद झाले. या एका निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा तब्बल १० हजार कोटींचा वार्षिक आर्थिक बोजा टळला आहे. या ‘फिल्टर’ प्रक्रियेनंतर आता केवळ १ कोटी ७७ लाख पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळेल. तांत्रिक…

Read More