Headlines

पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०७ परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध…

Read More

ज्ञानप्रबोधिनी, निगडीत 2 जुलैला 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर'चे उद्घाटन:ग्रामीण नवोपक्रम, उद्योजकता आणि समुदाय विकासाला मिळणार चालना

ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर – ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन (ACIC-JPIF)’ चे उद्घाटन २ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) संस्थापक संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता मनोहर सभागृहात हा सोहळा पार पडेल. या केंद्राद्वारे ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सक्षम व्यासपीठ…

Read More

भारतीय दर्शनशास्त्रातील विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारा:नीलेश ओक यांचे 'डायनॅमिक भारत 2047' व्याख्यानात प्रतिपादन

प्राचीन भारतीय इतिहास संशोधक नीलेश ओक यांनी भारतीय दर्शनशास्त्रातील वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. ‘डायनॅमिक भारत २०४७’ हे स्वप्न साकार करण्यासाठी ही दृष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पाश्चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण सोडून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरीक सोशल फाऊंडेशनने ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘डायनॅमिक भारत २०४७’ या विषयावर…

Read More

छत्रपती संभाजीनगर हादरले!:शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा थेट शिक्षकांवरच चाकू हल्ला; घटनेचा थरारक VIDEO

शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी फेल झाल्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने आधी…

Read More

बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करणार:देवेंद्र फडणवीस म्हणाले- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

राज्यात, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर होण्याचे आणि वाढत्या बालगुन्हेगारीचे प्रमाण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या ज्वलंत मुद्द्यावर विधानसभेत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका मांडली. लहान मुलांना गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या किंवा त्यांच्याकडून गुन्हे करवून घेणाऱ्या टोळ्यांवर आता ‘संघटित गुन्हेगारी’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, तसेच बालगुन्हेगारीचे वय…

Read More

चेंबूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड कोसळले, 10 विद्यार्थी जखमी; एक चिमुरडा अद्याप अडकलेला

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक कोसळले. या दुर्दैवी अपघातात बसमधील १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून, एक विद्यार्थी अजूनही बसच्या ढिगाऱ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Read More

काळीज पिळवटणारा अपघात!:अकोल्यात भरधाव दुचाकीची चिमुकल्याला भीषण धडक; थरार CCTV मध्ये कैद

अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निवासी वसाहतीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या धडकेने मुलगा हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण…

Read More

कौशल्याधिष्ठित शिक्षण आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक:सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांचे मत

सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतासाठी आणि २०२७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, कौशल्याची जोड मिळाल्यास आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट या गरजेनुसार कार्यरत असल्याचेही त्यांनी…

Read More

रोज 16 तास काम, नकार दिला की इलेक्ट्रिक शॉक!:म्यानमारच्या छळछावणीत महाराष्ट्राचे तरुण ओलीस, सुटकेसाठी धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सोशल मीडियावर मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर छळछावण्यांमध्ये अडकवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरमहा ७०…

Read More

'आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत':सचिन अहिरांचे स्वागत करत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर…

Read More