Headlines

श्रावणी सोमवार, नागपंचमीच्या दुहेरी योगामुळे औंढ्यात भाविकांची गर्दी:सकाळी आकरा वाजेपर्यंत 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी ता. १७ भाविकांची मोर्ठी गर्दी झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत तब्बल ४० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. संपूर्ण देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. भाविकांच्या रांगा कायम आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात…

Read More

मुंबईतील कांदिवलीमध्ये इमारतीला भीषण आग:11 जणांची सुखरूप सुटका, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील स्टेशन रोडवर असलेल्या एका चार मजली कमर्शियल इमारतीत सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. सकाळी सुमारे ४.१४ वाजता आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुसऱ्या मजल्यावरील लॉजिंगमधून ११ जणांची सुटका आगीच्या…

Read More

गोविंदा पथकांना स्पेन दौऱ्यावर पाठवणार : आशिष शेलार:दहीहंडीला युनेस्कोचे मानांकन मिळवून देऊ , मुंबईत ‘कृष्णानंद सोहळ्यात’ केले आवाहन

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. दहीहंडीचा समावेश ‘युनेस्को’ च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, मानवी मनोऱ्यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यातील निवडक गोविंदा पथकांना स्पेनच्या दौऱ्यावर पाठवले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. परळ…

Read More

दंडाची पावती नाही:कारला 3 दिवसांपासून जॅमर; तरुणाने वैतागून स्वत:ची कार पेटवली, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल

शहरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेली स्कोडा कार रविवारी (१६ जुलै) पेटवून दिली. विशेष म्हणजे एका तरुणानेच संतापाच्या भरात स्वत:च्याच कारला आग लावली असून त्याने या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस ३ दिवसांपासून दंडाची पावती देत नाहीत आणि कारही देत नसल्याचा आरोप या तरुणाने व्हिडिओमध्ये केला आहे….

Read More

पृथ्वीराज चव्हाणांना सध्या काही काम नाही:चर्चेत राहण्यासाठीच त्यांची धडपड; गोपीनाथ मुंडेंवरील दाव्यावरून बावनकुळे संतापले, रोहित पवारांवरही निशाणा

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम उरलेले नाही, त्यामुळे केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या…

Read More

लाडगाव रोडवर दुचाकींची धडक:एक ठार, दोन जखमी

लाडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. राहुल जगन्नाथ लिहिणार (३५, रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे मृताचे नाव आहे.राहुल लिहिणार हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. अपघातात लिहिणार यांच्यासह चंद्रप्रकाश प्रजापती व सोमनाथ प्रेमदास…

Read More

दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकलीसह तरुणाचा मृत्यू:3 जखमी : कुऱ्हा मार्गावर वीरगव्हाण-मार्डीदरम्यान अपघात‎

शहरातील गाडगेनगरमध्ये राहणाऱ्या होमगार्ड जवानाच्या बुलेटचा समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. या अपघातात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसह २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या आई-वडिलांसह आणखी एक तरुण जखमी झाला. हा हृदयद्रावक अपघात रविवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास कुऱ्हा मार्गावरील वीरगव्हाण ते मार्डीदरम्यान घडला. या अपघातात अभिज्ञा धीरज तायडे (अडीच वर्षे, रा. गाडगेनगर, अमरावती) आणि…

Read More

कर्जमुक्ती योजनेत 66,147 शेतकऱ्यांना 627.40 कोटी:2.41 हजार कोटी‎रुपयांच्या माफीची प्रतीक्षा‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार १४७ थकीत पीक कर्जदार शेतकरी सभासदांच्या खात्यावर ६२७.४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमार्फत १३६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. बँकेच्या प्रशासक संगिता डोंगरे यांनी ही माहिती दिली. शासनाकडून आधारप्रमाणीकरणासाठी…

Read More

कळवण:मानूरला उद्यापासून हरिनाम सप्ताह

तालुक्यातील मानूर येथे दि. १८ ते २५ ऑगस्टपर्यंत २३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामदैवत हनुमानराय, मार्कडेश्वर भगवंत व ब्रह्मलिन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी हर्षद भारती महाराज, शशिकांत मुडावदकर, नितीन मुडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. श्री मार्कडेश्वर बहुद्देशीय भजनी सेवा मंडळ,…

Read More

भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण‎

सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण…

Read More