Headlines

चांदुर रेल्वेत 1 कोटींचा गुटखा जप्त:10 टन सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा पकडला

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून पोलिसांनी सुमारे १ कोटी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १० टन सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार, १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. अमरावती ग्रामीणचे पोलीस…

Read More

सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू:मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली…

Read More

मुंबईच्या जे.जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या:गळफास घेत संपवले आयुष्य, मानसिक तणावात असल्याची माहिती

मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवासात राहणाऱ्या एका 26 वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604…

Read More

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन…

Read More

विकास लवांडे हल्ला प्रकरण: गंभीर कलमे वाढवण्यासाठी अर्ज:पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा, 14 मे रोजी आदेश अपेक्षित

प्रवचनकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हल्ल्यातील गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. बागल यांच्या न्यायालयात मंगळवारी हा अर्ज ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला. न्यायालयाने अर्ज विचारात घेतला असून,…

Read More

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे…

Read More

सारंग मांडके, सारंग भोईरकर यांना द. मा. मिरासदार पुरस्कार:जन्मशताब्दीनिमित्त गौरव; वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे युवा कलाकार सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना यंदाचा द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र कथन आणि स्वरचित काव्याद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कलाकारांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी आणि सचिव सुनेत्रा मंकणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ मिरासदार…

Read More

Pune Agri Hackathon 2026 Concludes; CM Fadnavis Present; 1290 Applications Received

‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण 17 मे 2026 रोजी सक . या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर एकूण 1 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे…

Read More

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश:चित्रपट, करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढा, अहवाल सादर करा

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी या प्रकरणी प्रशासनाला एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचेही आदेश दिलेत. मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार…

Read More