Headlines

‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार:सरनाईकांना आव्हान, म्हणाले- पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा

तुळजापूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर प्रश्न उपस्थित करताना केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील यांच्यावर ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग असल्याचा…

Read More

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू:निधी वाटपातील मनमानी अन् शासकीय कार्यक्रमात डावलल्याने संदीप क्षीरसागरांचा थेट इशारा

बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करत बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही न मिळाल्याने ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या…

Read More

ध्वजारोहणातील आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी!:म्हणाल्या- महापौरांना बसायला धड खुर्ची नाही, आमदारांनाही डावलले; प्रशासनावर टीकास्त्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या आसन व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन झाले नसल्याचे त्यांनी म्हटले. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत बसलेल्या असताना लोकप्रतिनिधींसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने हा मुद्दा चर्चेत आला. ‘आमदारांची बसण्याची व्यवस्था नीट नव्हती’ या प्रकाराबाबत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी मान-अपमानाचा प्रश्न…

Read More

सरकारी स्कूल ठीक करो अभियानाची हिंगोलीतून सुरुवात:शाळेत बेंचेस नाहीत, पण खिडकीला मात्र उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर; अभिजीत दिपकेंचा सरकारवर संताप

“स्वातंत्र्याला 80 वर्षे उलटून गेली, तरी आपण ग्रामीण भागातील शाळांमध्ये साधे पिण्याचे पाणी, मुलांना बसायला बेंचेस आणि स्वच्छ स्वच्छतागृहे देऊ शकलो नाही. एकीकडे नवीन संसद, नवीन पीएम हाऊस आणि मंत्र्यांचे फार्महाऊस बांधले जात आहेत, पण देशातील हजारो सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत,” असा घणाघाती आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला…

Read More

टाळमृदंगाचा गजर:राजराजेश्वर नगरीत श्री संत भास्कर महाराज पालखीचे उत्साहात स्वागत

श्री गजानन महाराजांचे शिष्य श्री संत भास्कर महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे राजेश्वर नगरीत भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त अकोली जहाँगीर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेली ही पालखी श्री विठ्ठल- रखुमाईचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली असता अकोला शहरात ठिकठिकाणी भाविकांनी तिचे स्वागत केले. पालखीचे सिंधी कॅम्प परिसरात संध्याकाळी आगमन झाले. यावेळी प्रमोद ठाकरे यांनी…

Read More

अकोला:तिरंगा मोटरसायकल रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दलातर्फे ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीची सुरुवात पोलिस अधीक्षक कार्यालयातून झाली. या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले….

Read More

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह:मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण

देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण मंत्रालय परिसरात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

तिरंगा रॅली:एनसीसीच्या विद्यार्थिनींचा ‘हर घर तिरंगा’ रॅलीतून देशभक्तीचा संदेश

श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या मार्गदर्शनात, अध्यक्ष दिलीपराज गोयनका व प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस युनिट, एलआरटी महाविद्यालयाचे एनसीसी युनिट व…

Read More

अकोला:सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची जन्मठेप कायम

कौटुंबिक वादातून आणि पत्नीला परत न पाठवल्याच्या रागातून सासरच्या घरी जाऊन सासऱ्याचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या जावयाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. शहरातील महात्मा फुले नगरातील विशाल सदाशिव गवई याचे लग्न शेजारीच राहणारे दिलीप सावंग यांची मुलगी…

Read More

शहर हद्दीपासून 20 किमीपर्यंत धावेल ‘ई-बस’:व्यवस्थापनासाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करण्याला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी‎

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत शहराला मिळणाऱ्या ४२ ई-बसेसच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेचे नियंत्रण असणारी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यास शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यासोबतच ई-बसेसचा नारंगी रंग निश्चित करण्यात आला असून शहराच्या महापालिका हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात या बसेस धावणार आहेत. त्यासाठी आवश्यक परिवहन परवानगी मिळवण्यासाठी ‘आरटीओ’ तसेच राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला…

Read More