Headlines

भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा:शनिदेवांच्या तेलातही ‘भेसळ’चा संशय

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिचौथऱ्यावर शनिमूर्तीला वाहण्यासाठी भेसळयुक्त अथवा बनावट तेलाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत आणि दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अमोल वाढेंकर, लखन ढगे, अर्जुन महाले व संतोष डांगे यांनी…

Read More

तिरंगा रॅली:‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी चांदवडला देशभक्तीचा जागर

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. १३) शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडली. ऐतिहासिक रंगमहाल येथून तिरंगा यात्रेला…

Read More

मुक्ताईनगर तालुकास्तर विज्ञान मेळावा:जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी देवश्री पाटीलची निवड; मान्यवरांनी केला सत्कार‎

तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा स्थानिक जे. ई. स्कूलमध्ये उत्साही वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जे. ई. स्कूलची विद्यार्थिनी देवश्री विकास पाटील हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वसंतराव मोरे…

Read More

दारणा धरणाला 114 वर्षे पूर्ण:स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा विद्युत रोषणाई..

इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धरणावर करण्यात आलेली तिरंगा रोषणाई या ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. ही तिरंगा विद्युत रोषणाई उपअभियंता पवन डेडवाल आणि शाखा अभियंता युवराज महाले त्यांच्या नियोजनातून आणि प्रयत्नातून करण्यात…

Read More

कन्नड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा:अर्जुन पाटील यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे‎

तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, करंजखेडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये रस्त्यांअभावी दळणवळण अवघड झाले आहे. या रस्त्यांसाठी विशेष अतिरिक्त निधी देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अर्जून नितीन पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कन्नड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य अर्जून पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी…

Read More

तालुक्यात आदित्यवर्धन जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष मोहिमेतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबद्दल दिली माहिती‎‎

कन्नड तालुक्यातील शैक्षणिक व गुणवत्तेचे वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी ‘एएलसी सोशल फाउंडेशन’चे संस्थापक आदित्यवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्यावतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएमएस, एमटीएसई आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती व मार्गदर्शन सत्रे राबवली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत नादरपूर, मोहाडी, कवडीरजनी, जवखेडा बुद्रुक,…

Read More

पाय धुऊन पाणी पिणे ही अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धा:पुण्यात आध्यात्मिक गुरू उमेश तांगुडेचा अजब खुलासा

आध्यात्मिक गुरू उमेश तांगुडे यांनी आपल्या अनुयायांकडून पाय धुऊन घेतल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना, ‘मी कोणत्याही महिला किंवा पुरुषाला माझे पाय धुऊन त्याचे पाणी प्या, असे कधीही सांगितलेले नाही. ही लोकांची श्रद्धा आहे,’ असा अजब खुलासा केला आहे. तांगुडे म्हणाले, ‘मराठीत एक म्हण आहे की, ‘माझ्या गुरूचे माझ्यावर इतके उपकार आहेत की, माझ्या गुरूचे पाय धुऊन…

Read More

स्वातंत्र्य दिन विशेष: राज्य शासनाच्या धोरणाचे विदारक वास्तव:देशभरात शहिदांच्या वारसांना नोकरी; राज्यात मात्र 5 एकर जमीन मिळेना

देशातील तेलंगण, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने शहिदांच्या वारसांना ‘विशेष बाब’ म्हणून थेट वर्ग-१ व वर्ग-२ च्या शासकीय पदांवर सामावून घेतले आहे. मात्र, महाराष्ट्रात आजही शहिदांचे वारस केवळ तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी आणि शासनाने जाहीर केलेल्या ५ एकर जमिनीसाठी लालफितीत अडकले आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या वारसांना विनाअट ५ एकर शेतजमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय…

Read More

FDA will register a case against the organizers if Mahaprasad is distributed without a license

श्रावण महिन्यात शहर व परिसरात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधेचे प्रकार घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. भावि . थेट कारवाई : नियम मोडल्यास काय होईल? : विनापरवाना महाप्रसाद वाटप केल्यास किंवा अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन…

Read More

रामदास आठवलेंचे एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक:म्हणाले- आठवले नीडर म्हणूनच मास लीडर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली. राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांनी आठवले यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या….

Read More