शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन
विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला…