Headlines

होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने…

Read More

गंगापुरात महावितरणच्या कामामुळे नागरीक त्रस्त:अधिकाऱ्याला निवेदनासोबत दिली दारूची बाटली‎

शहरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. कामाच्या तक्रारीसाठी संबंधितांना फोन केल्यानंतर ते न उचलून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याचा निषेध करण्यासाठी आज (३ जुन) रोजी अधिकाऱ्यांना निवेदन व दारूची बाटली देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी व नागरिकांनी उपकार्यकारी…

Read More

हुंड्यामोख शिवारात 1300 लिटर हातभट्टीचे रसायन जप्त:कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाची धडक कारवाई‎

कळवण पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले सुमारे १३०० लिटर रसायन व साहित्य जप्त केले. या कारवाईत ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यामोख-दयाणे दिगर शिवारातील बंधाऱ्याखालील नाल्यालगतच्या झाडाझुडपांमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गावठी…

Read More

वेरूळला 51 जोडप्यांच्या हस्ते होणार अभिषेक:सोहळ्यासाठी कोल्हापूरहून आणल्या सिंहासनारूढ शिवरायांच्या 51 मूर्ती‎

वेरूळ स्वराज्याची संकल्पभूमी व पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा शनिवार (६ जून) रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. शहाजीराजे भोसले स्मारकासमोर सकाळी ८ वाजता या सोहळ्याचे आयोजन केले असून या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ५१ मान्यवर जोडपी सपत्नीक…

Read More

मक्रणपूरचा ग्रामविकास अधिकारी 40 हजारांची लाच घेताना जाळ्यात:5 टक्के कमिशनची मागणी, एसीबीची ग्रामपंचायत कार्यालयात कारवाई‎

तालुक्यातील मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास ४० हजारांची रोख लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडले. विलास पिराजीराव जोंधळे (५०) असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी नवबौद्ध घटक परिसर विकास योजनेअंतर्गत आंबेडकरनगर येथे ५ लाख आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर, अण्णाभाऊ साठेनगर…

Read More

ओबीसींचे 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन:ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा, सरकारला अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई…

Read More

पुणे जिल्ह्यात गावोगावी जाऊन गर्भलिंग निदान:रॅकेट पकडले, आरोपीला अटक करून मशीन जप्त, इतरांचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले आहेत. याप्रकरणी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली

गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेनेचे सहा आमदार आणि खासदारांनी महायुतीमध्ये एकजुटीने राहावे, असा आदेश उपमुख्यमंत्री…

Read More

विधान परिषद उमेदवार विप्लव बाजोरियांना तूर्त दिलासा नाही:पुढील सुनावणी 17 जूनला, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रद्द झालेले विप्लव बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी १७ जून रोजी निश्चित केली आहे. बाजोरिया आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक १८ जून रोजी…

Read More

गुरुदेवनगरात मध्यरात्री घरफोडी:6 लाख 27 हजार रुपयांची रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

तिवसा शहरातील गुरुदेव नगर परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत हेमराज उर्फ हेमंत सुरेशराव बोबडे यांच्या घरातून तब्बल ६ लाख २७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही खळबळजनक घटना २ जूनच्या रात्री घडली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज…

Read More