Headlines

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कोर्ट काही घरात किंवा पुण्यात नाही, ओमराजेंनी आम्हाला शिकवू नये. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले आहेत, त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांच्या…

Read More

'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व'!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेना…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन:ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर खासदारांच्या जाहीर पक्षप्रवेशाची उत्सुकता!

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा १९ जून हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा ठरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तब्बल चार वर्षांनंतरचा सर्वात मोठा धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या ६ विद्यमान खासदारांनी पक्षाचा ‘व्हिप’ धुडकावून गुरुवारी दिल्लीतील संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली आणि एकनाथ…

Read More

राहात्यात विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर:गुन्हेगाराला कायद्यापुढे झुकावेच लागणार; विखेंच्या भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला दिलासा‎

राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच, प्रशासनाने आज एक मोठी आणि कडक कारवाई केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील य . ही धक्कादायक घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी तातडीने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले…

Read More

100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका:बीबीएफ व टोकण पद्धतीचा अवलंब करा, कृषी अधिकारी कोयले यांचे आवाहन‎

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. विशेषतः ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. काही…

Read More

भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत शुद्ध गरेदार तुपाच्या निमित्ताने आपण नेमके कोणते विष खात होतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच…

Read More

बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू येथील खासगी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध असल्याच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. ‘एफडीए’चे पथक गावात दाखल होताच बोरगाव मंजू व परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ…

Read More

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका‎

तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर…

Read More

महापालिकेला मिळाले 129 कोटी तरी शहरातील विकासकामे ठप्पच:ज्या कामासाठी निधी मिळाला त्यासाठीच वापरण्यावर प्रशासन ठाम‎

महानगरपालिकेला मागील काही महिन्यांमध्ये विविध शासकीय योजनांचा सुमारे १२९ कोटी रु.चा निधी मिळाला आहे. त्यानंतर वार्ड व प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत. अगदी आवश्यक लहान पुल रखडले आहेत. चर्चा केवळ कचऱ्याचीच होत आहे. कचऱ्यासाठी सर्वत्र ओरड सुरू आहे. इतर . मागील सात वर्षांपासून शहराच्या विविध प्रभागातील आवश्यक, परंतु लहान कामे मार्गी लागली नाहीत. कारण, मनपा प्रशासनाच्या…

Read More

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी आता ‘करो या मरो’चा इशारा:काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका, प्रशासनाला पूर्वकल्पना‎

येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा आता ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी या आशयाचे एक लेखी निवेदन आज, गुरुवारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी यांना सादर करीत प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा…

Read More