घाटनांद्र्यातील तरूणांची भारतीय सैन्य दलात निवड:शिवजयंती उत्सव समितीकडून जंगी सत्कार
घाटनांद्रा येथील तीन भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन दगडूबा कापसे, बळीराम चंद्रभान गोंधळे आणि अर्जुन सुभाष मोरे या तिघांची सैन्यात निवड झाल्याबद्दल शुक्रवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील बसस्थानक परिसरात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. देशसेवेचे स्वप्न…