काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…