Headlines

कन्नडमध्ये १२७०० क्विंटल मका खरेदी:२ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पैसे हस्तांतर

प्रतिनिधी |कन्नड शासकीय हमी भावाने कन्नड तालुक्यात खरेदी करण्यात येत असलेल्या मका खरेदीची मुदत ३० एप्रिलला संपुष्टात आली. आजपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर १२७०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नीलेश राठोड यांनी दिली. तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राठोड यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासकीय हमी भावाने कन्नड…

Read More

सारोळ्यात लोकसहभागाने शेतरस्ता; शेतात जाण्यासाठीची गैरसोय थांबणार:तीन लाखांचा निधी जमा करून केले रस्त्याचे काम, उपक्रमाचे कौतुक‎

प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारात शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, अडचणींसमोर हार न मानता सारोळा गावातील…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

दिव्य मराठी एक्स्प्लेनर:प्रदूषण रोखण्यामध्ये संभाजीनगरची मजल 50 टक्क्यांवर; मुंबई नापास, एमपीसीबीच्या 61% तपासण्या कागदावरच!

कारखान्यांच्या तपासण्या न करण्यामागे दिले अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) राज्याच्या पातळीवर कुचकामी ठरले आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालानुसार, राज्यात नियोजित भेटींपैकी तब्बल ६१ टक्के भेटी केवळ कागदावरच राहिल्या आहेत. म्हणजेच दर १०० कारखान्यांमागे ६१ ठिकाणी अधिकारी फिरकलेच नाहीत. राज्याची सरासरी तळाला…

Read More

जवळा बाजार शिवारात भर उन्हात पोलिसांचा उसाच्या फडाला वेढा:खून प्रकरणातील आरोपीला अटक, ड्रोनची ही झाली मदत

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथकाने रविवारी ता ३ भर दुपारी उसाच्या फाडाला वेढा देऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने आरोपीचा ठिकाणा देखील काढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील मनोहर साखरे (२६) या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार शनिवारी तारीख दोन पहाटे…

Read More

बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती…

Read More

'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘शक्ती’ कायदा, नवीन फौजदारी कायदे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आपले मत व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘शक्ती’ कायद्यातील अनेक…

Read More

लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत…

Read More

मावळमध्ये पर्यटनाचा भीषण अंत:पवना नदीत पुण्याच्या 3 मित्रांचा बुडून मृत्यू; पोहण्याचा मोह जीवावर बेतला

उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा आनंद लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. नदीत पोहण्याचा मोह या तरुणांच्या जीवावर बेतला असून, या भीषण दुर्घटनेमुळे मावळ परिसरासह मृतांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख हे तीन मित्र रविवारी सुट्टीनिमित्त मावळमधील…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. दरम्यान त्या कार्यालयातून नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा घेत होत्या. रविवारी सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी सुट्टीच्या दिवशी पाहणी करण्यासाठी आल्या. या दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कलिंग…

Read More