Headlines

माहिती अधिकार हा पैसे कमावण्याचे साधन नाही:RTIमधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची…

Read More

भय्याजी जोशी: 'कौशिक आश्रम' कर्तव्यपूर्तीचे केंद्र:संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांसाठी पुनर्निर्मित वास्तू

घरातील ज्येष्ठ मंडळींची विशिष्ट वयानंतर आपण जी सेवा करतो, ती सेवा नसते, तर ते कर्तव्य असते. ‘कौशिक आश्रम’ हे देखील संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची सेवा करणारे कर्तव्यपूर्तीचे केंद्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी शनिवारी केले. पुण्यातील मित्रमंडळ सोसायटीमध्ये असलेल्या ‘कौशिक आश्रम’ या वास्तूच्या पुनर्निर्माणानिमित्त आयोजित ‘कृतज्ञता सत्कार कार्यक्रमा’त जोशी…

Read More

पुण्यात 4 पिस्तुलं, 12 काडतुसे जप्त:कोथरूड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांना केली अटक

कोथरूड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तुलं, १२ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एक ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची सुरुवात पोलीस हवालदार शकील पठाण आणि संजय दहिभाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने झाली. त्यांना ‘कमीन्स कंपनी’च्या…

Read More

राहुल गांधींचे नेतृत्व वारसाहक्काने नव्हे, संघर्षातून उभे राहिले:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन

काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नेतृत्व केवळ वारसाहक्काने नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि त्यागातून उभे राहिले आहे. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या जागा दुप्पट करून राहुल गांधींच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दिला, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मुख्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त…

Read More

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना:यशवाडी येथे सभा मंडप कोसळला, 30 ते 40 जण अडकल्याची भीती

परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान संस्थान मंदिरापुढील सभागृहाचे छत आज दुपारी अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक भाविक छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनास्थळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारच्या गर्दीतच घडली दुर्दैवी घटना यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी…

Read More

बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे:शिंदे-ठाकरे गटाने दोन-दोन पाऊले मागे घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल

शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी एकत्र आल्यास पक्षाची शक्ती वाढेल, असे मत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कडू यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी, तर उद्धव ठाकरे यांनीही दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी. यामुळे…

Read More

Thackeray Faction Ultimatum to 6 Rebel MPs; Disqualification Threat Looms

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अवघ्या चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारून बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावेळी बचावात . पक्षनेतृत्वाचा थेट आणि आक्रमक इशारा पक्षाच्या अधिकृत बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना…

Read More

रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता…

Read More

पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास…

Read More

आता एकच शिवसेना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंची!:कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांचा टोला; महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्याचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली. याचसोबत भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून टोला देखील लगावला आहे. आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा…

Read More