Headlines

टरबूज खाऊन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा:मृताच्या अंतर्गत अवयवांना 'हिरवट' रंग; न्यायवैद्यक चाचणीत घातक विषबाधा झाल्याचे स्पष्ट

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृत्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत घातक विषबाधा किंवा एखाद्या षडयंत्राचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू…

Read More

महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा मोठा संकल्प:अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणारच; बीडमध्ये भावुक, विकासाचा नवा रोडमॅप जाहीर

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड दौऱ्यात भावनिक होत दिवंगत अजित पवार यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अजितदादांनी बीडसाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगताना त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना भावुक झाल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये ध्वजारोहण करून नागरिकांना संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. बीड…

Read More

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎

आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर वाढणे), डोळे दुखणे, पाणी येणे, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, या समस्या वेळेत ओळखल्या नाहीत तर मुलांच्या शिक्षणावर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान वयातच डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान…

Read More

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया

माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अहिल्यानगरमध्ये कालच उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरीराला नैसर्गिक शीतलता देणाऱ्या तीन योगिक क्रिया योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या आहेत. या क्रिया अत्यंत सोप्या…

Read More

महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि विकासाच्या प्रवासाचा आढावा घेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रमिक दिनाच्याही निमित्ताने कामगारांना कृतज्ञतेचा सलाम केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन‎

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. . काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र, इतर…

Read More

फडणवीस सरकारचे 'आपले सरकार' ठप्प:तांत्रिक बिघाडाने गोंधळ, नागरिक त्रस्त; मंत्री आशिष शेलारांचा तातडीचा आदेश

राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 27 एप्रिलच्या रात्रीपासून या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अचानक बंद पडलेल्या…

Read More

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव, त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुजनगरी येथील महासमाधी परिसरात गुरुवारी ३० रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हृदस्पर्शी ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपात साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुजनगरीत गावकऱ्यांनी…

Read More

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत…

Read More

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते महाराष्ट्र पोलिस अशी स्पर्धा करत असताना विवाहानंतर दोन अपत्य असताना जीवनातील ध्येयाला कवेत घेणाऱ्या या मातेच्या संघर्षाला सलाम क Source link

Read More