Headlines

वृक्षारोपण अभियानामधून‎राहात्याचा होणार कायापालट‎:"साईयोग''च्या पुढाकारातून खटकळी येथे वृक्षारोपण‎

प्रतिनिधी | राहाता येथील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे राहाता व परिसरात गेल्या १७ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणार्थ गेल्या ९ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान अंतर्गत हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धनही केले आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसर येथे १२ फुटी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी…

Read More

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ…

Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात रांजाळा शिवारात आंदोलन:जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत 22 जणांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात पत्रादेवी ते पवनार या सुमारे ८०० किलो मिटर अंतराच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात २२ जणांवर बुधवारी ता. २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रादेवी ते पवनार हा…

Read More

मालट्रक पहाटे उलटला; वाहतूक मात्र सायंकाळपर्यंत कोलमडली:दुभाजकावर चढून रस्त्यातच कोसळला अवजड मालट्रक‎

महामार्गावर मक्याच्या दाण्यांचा सडा, गोण्यांचा खच आणि दिवसभर कर्णकर्कश हॉर्नचा आवाज… हे चित्र होते अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल अक्षय पॅलेस ते इंद्रायणी परिसरातील. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मका वाहून नेणारा ट्रक (एमएच २१ एक्स ८९११) दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण भीषण अपघात झाला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली. पहाटे अपघात होऊनही दुपारपर्यंत दुभाजकावर चढलेला ट्रक…

Read More

लोकस्वातंत्र्य महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सन्मान:महापुरूषांना सामुहिक श्रद्धांजली केली अर्पण‎

प्रतिनिधी | अकोला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन मेळावा व महिला सन्मान समारंभ महसूल कॉलनीतील रोकडे सभागृहात संपन्न झाला. माझ्यासोबत एवढ्या मोठ्या महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला. हा सन्मान ही मला मिळालेली माहेरची साडी समजते, असे मनोगत लोकसाहित्याच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी…

Read More

विज्ञान चळवळ होण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक -अनिल काकोडकर:कुंभारी येथे विज्ञान, इनोव्हेशन केंद्राचे भूमिपूजन; नवीन संकल्पनांवर चर्चा व्हावी‎

प्रतिनिधी | अकोला प्रत्येक कामाचे ज्ञान असणे व ते का हवे याचे भान व त्या कामासाठी समर्पण असणे गरजेचे आहे. ज्ञान, जाण व पॅशन या त्रिसूत्राने कोणत्याही बाबीचा विकास साधला जातो. याच अनुषंगाने हे विज्ञान व इनोव्हेशन केंद्र नवे प्रकल्प, नवाचार साकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणू वैज्ञानिक डॉ. अनिल…

Read More

वीज प्रश्नावरून महावितरणवर‎नगरसेवक अन् महिलांचा मोर्चा‎:महावितरण विभाग तक्रारी गांभीर्याने घेत नाही, नागरिकांचा आरोप‎

प्रतिनिधी | दर्यापूर शहरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने सामान्य नागरिक विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापुरच्या नगरसेवकांनी आज, बुधवारी दुपारी थेट विद्युत वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवकांनी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निषेध…

Read More

यशवंत टॅलेंट सर्च परीक्षेत‎विद्यार्थ्यांचे घवघवीत यश‎:५५ शाळांमधील ३२०० विद्यार्थ्यांचा सहभाग‎

प्रतिनिधी | सोनई नेवासा तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित यशवंत टॅलेंट सर्च या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील एकूण ३२०० विद्यार्थी ५५ शाळांमधून सहभागी झाले होते. या निकालात तालुका स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यश अकॅडमीचा अमेय लेंबे ९६ टक्के गुणांसह प्रथम, श्रीनिका बानकर, आरुष कुलकर्णी, सागर धापटे दोघे यांनी ९४ टक्क्यांसह द्वितीय, तसेच ९० टक्के…

Read More

लोणी सरपंच पोटनिवडणुकीचा‎निकाल, गणेश ठेंगडे यांचा विजय‎:सदस्यपदी अरुणा दांडेकर यांची निवड, ७५ टक्के मतदान‎

प्रतिनिधी | खुलताबाद तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या सरपंचपद तसेच प्रभाग क्रमांक १ मधील सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल उत्सुकतेच्या वातावरणात अखेर जाहीर झाला. या निवडणुकीत सरपंचपदी गणेश दादाराव ठेंगडे यांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक १ मधून सदस्यपदी अरुणा बाबासाहेब दांडेकर या विजयी झाल्या. मंगळवारी (२८ एप्रिल) मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली….

Read More

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कृतिशील पाऊल‎:कन्नड येथील कार्यक्रमात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती‎

प्रतिनिधी | कन्नड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ घोषणा नाही, त्या दिशेने कृती सुरू आहे. अंमलबजावणीही होत आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी रोजी कन्नड येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते….

Read More