Headlines

'फुलचंद पानात' नशा करणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त:शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना,…

Read More

बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल:सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होणार; राहुरीत अक्षय कर्डिले मारणार बाजी ”रिंगसाईड रिसर्च” चा एक्झिट पोल

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. रिंगसाईड रिसर्च या कंपनीनेने केलेल्या एक्झिट पोल नुसार बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी…

Read More

बुलढाणा मेडिकल कॉलेजला राजमाता जिजाऊंचे नाव:राज्य शासनाचा मोठा निर्णय; राजमातांच्या जन्मभूमीचा आणि स्मृतींचा गौरव

बुलढाण्यातील 100 विद्यार्थी क्षमता आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नामकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मंजुरी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्याने, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला…

Read More

धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात:ब्रेक निकामी, चाकेही निखळली; 3 किमीपर्यंत मृत्युचा थरार, 15 प्रवासी जखमी

धुळ्याहून भुसावळकडे निघालेल्या एका एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेली बस तब्बल ३ किलोमीटरपर्यंत मृत्यूच्या छायेखाली धावत होती. अखेर रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला बस धडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या…

Read More

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका:15 ऑगस्टपर्यंत मुदत – प्रताप सरनाईक; मराठी प्रवाशांनाही केले महत्त्वाचे आवाहन

महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परप्रांतीय चालकांसाठीच्या ‘मराठी मार्गदर्शन पुस्तिकेचे’ प्रकाशन करण्यात आले. येत्या १ मे पासून ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून, १५ ऑगस्टपर्यंतची मुदत चालकांना देण्यात आली…

Read More

विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट?:99 टक्के उद्धव ठाकरेच उमेदवार; मविआमध्ये ठाकरेंच्या उमेदवारीवर संभ्रम; शेवटच्या क्षणी मोठा निर्णय?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मात्र 99 टक्के उमेदवार उद्धव ठाकरेच असतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तरीही त्यांनी 1 टक्का सांगता येत नाही, पण बॉस इज ऑल्वेज राईट, असे म्हणत अंतिम निर्णय नेतृत्वावरच अवलंबून असल्याचे सूचित केले….

Read More

मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली:पुण्यात पाच आरोपींना अटक, 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुण्यात एका विवाह समारंभातील मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची सोन्याची साखळी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी…

Read More

संत परंपरा नामशेष झाल्यास वाईट वाटू नये:हिंदी कथाकारांच्या वाढत्या प्रभावावर अमोल मिटकरींचा इशारा, वारकरी संस्कृती धोक्यात असल्याचा दावा

महाराष्ट्राच्या शहरी भागांत सध्या उत्तर भारतीय शास्त्री आणि आचार्यांच्या हिंदी कथांचा ‘महापूर’ आला असून, यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली वारकरी संत परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. संतांच्या या भूमीत दांभिकता पसरवणारे आपलेच लोक असून, भविष्यात विठ्ठल संप्रदाय केवळ आठवणीत उरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अमोल…

Read More

श्याम मानव यांचे आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले:म्हणाले – ज्यांना खाज असेल, त्यांनी दरबारात यावे; आमच्याकडील विद्येचे सादरीकरण करू

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागपूरच्या रेशीम बागेत 26 ते 30 एप्रिलपर्यंत श्री राम कथा करत आहेत. या दरम्यान धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यात श्रद्धा, अध्यात्म आणि विज्ञानावरून वाद वाढला आहे. श्याम मानव यांनी 80 लाख रुपयांचे आव्हान दिले होते. हे आव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी स्वीकारले आहे. श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींना…

Read More