Headlines

भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत शुद्ध गरेदार तुपाच्या निमित्ताने आपण नेमके कोणते विष खात होतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच…

Read More

बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू येथील खासगी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध असल्याच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. ‘एफडीए’चे पथक गावात दाखल होताच बोरगाव मंजू व परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ…

Read More

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका‎

तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर…

Read More

महापालिकेला मिळाले 129 कोटी तरी शहरातील विकासकामे ठप्पच:ज्या कामासाठी निधी मिळाला त्यासाठीच वापरण्यावर प्रशासन ठाम‎

महानगरपालिकेला मागील काही महिन्यांमध्ये विविध शासकीय योजनांचा सुमारे १२९ कोटी रु.चा निधी मिळाला आहे. त्यानंतर वार्ड व प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत. अगदी आवश्यक लहान पुल रखडले आहेत. चर्चा केवळ कचऱ्याचीच होत आहे. कचऱ्यासाठी सर्वत्र ओरड सुरू आहे. इतर . मागील सात वर्षांपासून शहराच्या विविध प्रभागातील आवश्यक, परंतु लहान कामे मार्गी लागली नाहीत. कारण, मनपा प्रशासनाच्या…

Read More

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी आता ‘करो या मरो’चा इशारा:काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका, प्रशासनाला पूर्वकल्पना‎

येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा आता ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी या आशयाचे एक लेखी निवेदन आज, गुरुवारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी यांना सादर करीत प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा…

Read More

‘रिलस्टार’ आत्महत्या प्रकरणी, पतीविरुद्ध गुन्हा:वडिलांच्या फिर्यादीनंतर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा‎

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रम्हपुरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, फिर्याद मयत महिलेचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (वय ५१, रा. अर्धनारी) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी, समाज माध्यमावर…

Read More

येत्या 2वर्षांत पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान होणार पर्यटनाचे जागतिक केंद्र:विकासकामांचा आमदार विलास भुमरे यांच्याकडून आढावा‎

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण नगरीच्या वैभवात आता आणखी भर पडणार असून, येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार विलास भुमरे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर उद्यानात आयोजित विकासकामांच्या आढावा…

Read More

मालेगावमध्ये 84 पैकी 83 नगरसेवकांचे मतदान:हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने झाले नाही मतदान‎

मालेगाव विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.१८) महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती पुत्र हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान, मालेगाव सेक्यूलर फ्रंटच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांनी लोकशाही वाचविण्यासाठी तानाशाहीविरोधात मतदान केल्याची भूमिका मांडत २२ जूनला लोकशाहीचा विजय होईल,…

Read More

पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता‎

देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…

Read More

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी हस्तकला व्यवसाय व परिसर विकास असोसिएशनने आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेवर हे शॉप सुरू केले जाणार आहे ती जागा…

Read More