प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग
मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…