Headlines

शेलापूर येथे पोलिओ मोहीम उत्साहात‎:शून्य ते पाच वर्षांतील बालकांना दिले पोलिओचे दोन थेंब,महिलाचा पुढाकार

प्रतिनिधी | मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, शेलापूर बु.च्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका…

Read More

166 शाळांमधील 18 हजार 704 विद्यार्थ्यांना गणवेश:पुस्तकांचे वितरण, नवप्रवेशित विद्यार्थ्यांची कुठे बैलगाडीतून तर कुठे वाहनातून प्रवेश मिरवणूक‎

. नवीन मित्र नवीन पुस्तके व नवीन शालेय गणवेश या तीन गोष्टीच्या आनंदाच्या मेळ्याची अनुभूती तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या दिवशी ३० जून रोजी आली. नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे केवळ गुलाब पुष्प देऊन स्वागतच नव्हे तर त्यांची कुठे सजवलेल्या बैलगाडीतून कुठे उघड्या जीप मधून तर कुठे चार चाकी वाहनातून गावातून मंगल वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांतर्फे त्यांचे…

Read More

पंढरीत पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम:आषाढी यात्रेची तयारी, जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह पथक रस्त्यावर‎

आषाढी यात्रेच्या नियोजित कामाला प्रशासनाकडून सुरुवात केली असून शहरात विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोडा उचलला आहे. बुधवार (दि. १ जुलै) रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. यंदाची आषाढी यात्रा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली आहे. यात्रा नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे, नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार…

Read More

धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन

प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह…

Read More

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….

Read More

अन्वी फाट्याजवळ बस नालीमध्ये घसरली; 7 प्रवासी किरकोळ जखमी:सारोळ्याहून सिल्लोडकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात‎

पालोद-अन्वी फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील नालीत घसरली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथून अन्वीमार्गे सिल्लोडकडे येत असलेली एसटी बस (एम.एच. २९ बीएल १६२१) अन्वी फाट्याजवळील वळणावर आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले….

Read More

सिद्धेश्वर हायस्कूलमधील 935 विद्यार्थ्यांना दिली वृक्षांची भेट:सिल्लोड तालुक्यातील शाळांमध्ये ‘एक विद्यार्थी एक झाड’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असून, समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वृक्षवल्ली टीम सिल्लोड आणि योगेश पाटील यांनी ८ मार्च रोजी केलेला १०,५८५ वृक्षलागवडीचा संकल्प आता साकार होत आहे. . या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिन या दोन्ही महत्त्वपूर्ण…

Read More

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने . ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर…

Read More

ख्रिश्चन झालेल्या महिलेसह 30 कुटुंबे झाली पुन्हा हिंदू:सोलापुरात मातृशक्ती आयाम संघटनेची मोहीम

‘माझ्या मानेला गाठ असल्याने मी वारंवार आजारी पडत होते. काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रार्थनेसाठी गेले. तिथे मला आजारपणातून बरे होण्यासाठी परंपरा बदलण्यास सांगण्यात आले. विधी करून माझा प्रवेश निश्चित झाला. मात्र तीन वर्षे होऊनही मला आजारपणातून सुटका मिळाली नाही. घरी पूजा करण्यासही मनाई होती. नंतर समुपदेशनामुळे मी पुन्हा स्वधर्मात आले…’ ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात…

Read More

अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज मंदिराला भीषण आग:शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या मंदिराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण लाकडाची वाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर, पारोळा, धरणगावचे अग्निशमन पथक दाखल झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाहीये. आगीचे भयावह दृश्य पाहा Source link

Read More