Headlines

नागरदेवळे येथील शिबिरामध्ये २७० नागरिकांची केली मोफत नेत्रतपासणी:गरजूंना चष्म्यांचे वाटप, रक्तदाब व मधुमेहाचीही केली तपासणी‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर मातृत्व दिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील नागरदेवळे येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिला, गरजू नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करत सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली….

Read More

दहावी परीक्षेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचा ध्रुव गायकवाड प्रथम:गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील ज्ञानसंपदा शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीच्या निकालात गायकवाड ध्रुव याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळवले. वेदांत बर्वे याने ९६.२% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषभ वांडेकर याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक…

Read More

बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर

प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से…

Read More

मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते:दुसरी बाजू माहीत नव्हती, रूपाली चाकणकरांचा एसआयटीसमोर दावा

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची काल नाशिक येथे विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत खरातशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला. दरम्यान, रूपाली…

Read More

सिल्लोडला महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने अभिवादन:नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रतिनिधी | सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक येथे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सत्तार म्हणाले, स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य व…

Read More

दहा वर्षे अपघातमुक्त सेवा; एसटी चालक जालिंदर डघळे यांचा सन्मान:प्रामाणिकपणा, शिस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेसाठी डघळेंचा गौरव‎

प्रतिनिधी | खंडाळा सध्याच्या धावत्या युगात अपघात टाळणे अवघड असले तरी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगल्यास ते निश्चितच कमी केले जाऊ शकतात. सध्याची जीवनशैली, वाहनांची वाढती संख्या आणि घाई गडबड यांमुळे रस्ते अपघातांचा धोका वाढला असला तरी प्रवाशांची काळजी घेत दहा वर्षांत उत्कृष्ट सेवा बजावल्याचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील जालिंदर डघळे (चालक) परिवहन महामंडळ वैजापूर…

Read More

लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

लाडसावंगी | येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य झामसिंग बाम्हणावत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ​या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य ​रमेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष…

Read More

महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचे‎विचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम‎:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव‎

प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित…

Read More

मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ची एन्ट्री:22 जिल्ह्यांत दौरा; उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात 100 मतदारसंघांवर शिंदेसेनेचे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या रणांगणात “मुख्य समन्वयक’ म्हणून उतरले आहेत. १६ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेत मुंबईचा “रिमोट कंट्रोल’ त्यांच्या हाती असणार आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे २२ जिल्ह्यांतील ७० विधानसभा मतदारसंघांत जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राजकीय वर्तुळात याला “ठाणे…

Read More

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More