बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…