Headlines

काश्मीरातील लक्ष्यित हत्या थांबवण्याची उपाययोजना:बाहेरील मजुरांसाठी क्लस्टर होणार तयार, पण सर्वप्रथम पोलीस ठाण्यात जाऊन कळवावे लागेल

काश्मीरमधील कुलगाम येथे 4 दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने नवीन सुरक्षा धोरणावर चर्चा तीव्र केली आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या सुमारे 4 लाख स्थलांतरित मजूर राहतात. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. यात काही निर्देश निश्चित करण्यात आले आहेत. प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या…

Read More

अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला- जोगदंड:अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा‎

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे समग्र लेखन वंचित, शोषितांच्या दमनाविरूद्ध उभे राहिले. त्यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला. हाच वारसा युवा पिढीने पुढे न्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी शिवाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात…

Read More

शॉर्टसर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक:पैठणची घटना; कावसानकर यांचे मदतीचे आश्वासन‎

शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू व अन्य सामग्री जळून खाक झाली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील कडुबाई भगवान घुंगासे व आशाताई घुंगासे यांच्या राहत्या घरात अचानक विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने घराचा मोठा भाग…

Read More

जायकवाडी धरणात आवक कायम; उपयुक्त पाणीसाठा 88 टक्क्यांवर:22 हजार 390 क्युसेक वेगाने पाणी दाखल, मराठवाड्याला दिलासा‎

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी वरच्या धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत पाण्याची आवक कायम आहे. सोमवारी धरणात २२ हजार ३९० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, सध्याच्या घडीला धरणाचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले असून आज मंगळवारी वरील आवक बघून मुख्य सांडव्याद्वारे…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा 12 वा दिवस:सरकारचा IT दुरुस्तीसह 5 विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न; देणगी चोरीवर विरोधक आक्रमक

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १२वा दिवस आहे. गेल्या ३१ जुलैपासून राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सतत गदारोळ सुरू आहे. लोकसभेने काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या (CJI सह) ३४ वरून ३८ पर्यंत वाढवण्यासंबंधीचे विधेयक चर्चेविना मंजूर केले. तर राज्यसभेने ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ मंजूर केले. या अधिवेशनासाठी एकूण…

Read More

सेनेच्या पालकमंत्र्यांनी जि.प.चा निधी अडवताच उबाठा भाजपच्या मदतीला:आमदारांना 40% नियोजन करू द्या- पालकमंत्री; अध्यक्ष गलांडे, आ. दानवेंचा विरोध

“डीपीसीचा निधी कोणाच्याही वैयक्तिक मालकीचा नाही, पालकमंत्र्यांचा तर मुळीच नाही. डीपीसीचे सहअध्यक्ष असलेल्या जि.प. अध्यक्षांना पालकमंत्र्यांइतकाच अधिकार आहे. झेडपीचा निधी त्यांना थेट अन् सरळ वितरित झालाच पाहिजे,’ असे आमदार अंबादास दानवे म्हणाले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा परिषदेचा निधी अडवताच उबाठा गट सत्तास्थापनेनंतर पुन्हा भाजपच्या मदतीला धावल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेत विविध विभागांचा आढावा आमदार…

Read More

14व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर जखमा कशा नाहीत?- कोर्ट:24 ऑगस्टला सुनावणी; आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ

सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेला प्रख्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटींवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. “दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल स्पष्ट संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवून रीतसर तपास का केला नाही?’ असा थेट सवाल न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती…

Read More

धुळे तालुक्यात म्हशीला तलावातून बाहेर काढताना शेतकरी-गुराखी बुडाला:म्हैस वाचली, निमडाळे तलावावरील घटनेत दोघांचा मृत्यू

तलावातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर बुडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला गुराखी अशा दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती बालंबाल बचावला. या घटनेत म्हैस स्वत:हून पाण्यातून बाहेर आली. घटना रविवारी संध्याकाळी धुळे शहराजवळील निमडाळे शिवारात घडली. बापू पांडुरंग पाटील (६५) व दशरथ नाना मोरे (३८) अशी मृतांची नावे…

Read More

दतियात BJPची हार – काँग्रेसचा विजय, 5 कारणे:नरोत्तम फॅक्टर अपयशी, जातीय समीकरण साधण्यात भाजपला अपयश; बूथ व्यवस्थापनात काँग्रेस वरचढ

दतिया पोटनिवडणुकीचा निकाल फक्त एका जागेचा निर्णय नाही, तर दोन्ही पक्षांच्या रणनीती आणि भविष्यातील राजकारणाचे संकेतही बनला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि संघटनेची पूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांच्याकडून 6,016 मतांनी हरले. 2023 मध्येही काँग्रेसने याच जागेवर डॉ. नरोत्तम मिश्रा यांना 7,742 मतांनी हरवले होते. पराभवानंतर आशुतोष तिवारी यांनी…

Read More

नांदेडला क्रिकेटच्या वादातून दहावीच्या 2 विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर चाकूने हल्ला:शाळेच्या मध्यंतरात गाठून शाळेबाहेर नेऊन केले 9 वार

नांदेडजवळील असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात सोमवारी दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रावर चाकूने ९ वार केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. हा विद्यार्थी गंभीर जखम . शनिवारी दिनेश (बदललेले नाव) आणि त्याच्या दोन वर्गमित्रांमध्ये क्रिकेटवरून भांडण झाले होते. त्यात दिनेश व त्याच्या मित्रांनी त्या दोघांना मारहाण केली…

Read More