Headlines

Pune Hosts Parambh 2026 for International Tax System Reforms

आयकर विभागाने पुण्यात ‘प्रारंभ २०२६’ अंतर्गत एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधील बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा उद्देश विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि करप्रणाल . पुणे येथील ‘बोधी टॉवर’ आयकर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय करप्रणाली व ट्रान्सफर प्रायसिंग) मोहित जैन यांच्या…

Read More

भाजप 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना देणार धक्का:अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सांगितला प्लॅन

भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….

Read More

चांदी ₹3761ने घसरून ₹2.65 लाख प्रति किलोवर:सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.21 लाख घटली; आज सोन्याचे दर ₹1116 ने स्वस्त झाले

आज म्हणजेच 20 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 3,761 रुपयांनी कमी होऊन 2.65 लाख रुपयांवर आली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,116 रुपयांनी घसरून 1.58 लाख रुपये झाला आहे. 29 जानेवारी रोजी सोने 1.76 लाख आणि चांदी 3.86 लाख…

Read More

नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेत गदारोळ:आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्याने अरविंद सावंत आक्रमक, सुप्रिया सुळेंचाही तीव्र आक्षेप

केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, “मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही…

Read More

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना…

Read More

रामायणाच्या पहिल्या भागात राम-रावण यांचा संघर्ष होणार नाही:रावणाची भूमिका साकारणारे यश म्हणाला- पहिल्या भागात रणबीरसोबत माझा कोणताही सीन नाही

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यशने खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या पहिल्या भागात त्याचा आणि राम बनलेल्या रणबीर कपूरचा कोणताही सीन एकत्र नसेल. यशने सांगितले की, पहिल्या भागात दोन्ही पात्रांना त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये दाखवले जाईल, त्यामुळे पडद्यावर कोणताही फेस-ऑफ (आमना-सामना) होणार नाही. रावणाचे स्वतःचे साम्राज्य असेल, रामाचे स्वतःचे अलीकडेच यश आणि चित्रपटाचे…

Read More

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट; म्हणाले- शिकवू पण वाद नको

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयानुसार रिक्षा आणि…

Read More

निर्णायक पाऊल:“डिजिटल गुंडागर्दी’ रोखण्यासाठी राज्य सरकारचा नवा कायदा येणार, 3 महिन्यांत तयार होणार नव्या कायद्याचा मसुदा

सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद गैरवापर आणि त्यातून जाणीवपूर्वक केले जाणारे डिजिटल चारित्र्यहनन रोखण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप यांसारख्या व्यासपीठांवर पुराव्याशिवाय अफवा पसरवून कुणाचीही बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कठोर कायद्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलिस…

Read More

होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यावर भीक मागण्याची वेळ:नांदेडच्या तरुणावर मुंबईत हरवल्याने आली वेळ, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे मायेची ऊब

मुंबईतील मालाड परिसरात भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या नियमित पोलिस मोहिमेदरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. रस्त्यावर भटकताना आढळलेला एक तरुण प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या या तरुणाचा मालाड पोलिसांनी शोध घेऊन कुटुंबाशी संपर्क साधला आणि अखेर मालाड पोलिस ठाण्यात भावनिक पुनर्मिलन घडून आले. ही…

Read More

11 शाळांचा निकाल 100 टक्के:दर्यापूर तालुक्याचा 92.83 टक्के निकाल; 2139 विद्यार्थी झाले उत्तीर्ण, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाकडून स्वागत‎

माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी आँनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात दर्यापूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. परिक्षेत बसलेल्या २३२३ विद्यार्थ्यांपैकी २१३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आदर्श हायस्कूल, दर्यापूरचा निकाल १०० टक्के लागला असून प्रबोधन विद्यालयाने ९५.४९ टक्के निकाल मिळवला आहे. दारापूर हायस्कूल, दारापूरचा निकाल ८९.३६…

Read More