Headlines

आधी दैवी शक्तीचा बागुलबुवा:आता स्मृतिभ्रंशाचे करतोय नाटक, भोंदू खरातविरोधात 19 वा गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरात (६७) याला रविवारपर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी त्याला ऑनलाइन हजर करण्यात आले होते. दरम्यान, सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या राइट हँड ललित पोफळे यालाच खरातने तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खरातविरोधातील दाखल झालेला हा १९ वा गुन्हा आहे….

Read More

इराणने महाराष्ट्राच्या संपन्नतेचा व्हिडिओ पोस्ट केला:भारताला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार इराणी दूतावासाने ठेचून टाकला

अहंकार शिगेला पोहोचलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत म्हणजे नरकाचा खड्डा’ असे वक्तव्य गुरुवारी (२३ एप्रिल) केले होते. त्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चोख उत्तर तर दिलेच, पण गेल्या ५५ दिवसांपासून अमेरिकेशी युद्धात जबरदस्त झुंज देत ट्रम्प यांना हतबल करणाऱ्या इराणने भारताच्या वतीने तडाखेबंद प्रतिहल्ला केला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने एक पोस्ट सोशल मीडियावर…

Read More

Reliance Q4 Revenue Surges 13% to ₹2.98 Lakh Cr; ₹6 Dividend For Shareholders

Marathi News Business Reliance Q4 Revenue Surges 13% To ₹2.98 Lakh Cr; ₹6 Dividend For Shareholders 1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13% नी घटून 16,971 कोटी रुपये राहिला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत नफा ₹19,407 कोटी होता….

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित:महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी निर्णय

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याचा उद्देश पावसाळ्यापूर्वी वीज…

Read More

पुण्यात गोळीबाराचा थरार!:वारजेतील सलूनमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार, दोन जण जखमी; परिसरात खळबळ

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आज सायंकाळी 8 च्या सुमारात वारजे परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. येथील एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमींना…

Read More

परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू:घाटीत 20 टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, रुग्णसेवा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू असून, याचा परिणाम घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपामुळे घाटी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया सुमारे २० टक्क्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, परिचारिकांना दुहेरी शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे, ज्यामुळे रुग्णसेवेवर ताण वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे ८०० परिचारिकांनी संप पुकारल्याने…

Read More

सांवलिया सेठ मंदिरात एका महिन्यातील देणगीचा विक्रम:₹41.67 कोटी जमा झाले; भक्तांनी 600 ग्रॅम सोने, 84 किलोपेक्षा जास्त चांदी दान केली

चित्तौडगड (मेवाड) येथील श्रीसांवलिया सेठ मंदिराला एका महिन्यात मिळालेल्या देणगीच्या रकमेने नवा विक्रम केला आहे. एका महिन्यात (18 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत) एकूण 41 कोटी 67 लाख 38 हजार 569 रुपये देणगीची रक्कम प्राप्त झाली. एडीएम आणि मंदिर मंडळाच्या सीईओ प्रभा गौतम यांनी सांगितले की, 16 एप्रिल रोजी चतुर्दशीच्या दिवशी मंदिराचा भंडार उघडण्यात आला होता….

Read More

चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव

ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…

Read More

साताऱ्यात NCERT विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच…

Read More

काळजाचा थरकाप!:आंबेनळी घाटात दुचाकी 700 फूट खोल दरीत कोसळली; वाईचे दाम्पत्य जागीच ठार

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडून जागीच ठार झालं. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई), असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. घाटातील धोकादायक वळणावर मोटरसायकल बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. पाऊस आणि धुक्यामुळे प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी खडतर परिस्थितीत रेस्क्यू…

Read More