Headlines

अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विराट मुंबईत पोहोचला:विमानतळावर दिसला; आज अभिनेत्री 38 वर्षांची झाली

विराट कोहली शुक्रवारी पत्नी अनुष्का शर्माचा 38 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत आले. कोहली अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2026 चा सामना खेळल्यानंतर मुंबईत पोहोचले. ते सकाळी मुंबई विमानतळावर दिसून आले. विमानतळावर पॅपाराझींनी कोहलीला अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगितले. विराट आणि अनुष्काचे 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न झाले होते. त्यांना…

Read More

केरोसीन उचलण्यास स्वस्त धान्य दुकानदारांचा नकार:अत्यल्प कमीशन, वितरण किती कालावधीसाठी राहणार याची शाश्‍वती नसल्याचे कारण

हिंगोली जिल्ह्यात केरोसीन विक्रीचे कमीशन केवळ एक रुपया लिटर असून ग्राहकअन केरोसीनची पुरवठा यामध्ये असमतोल असल्याने वादाचे प्रकार होण्याची शक्यता तसेच वितरणाचा निश्‍चित कालावधी नसल्याने हिंगोली जिल्हयातील सुमारे ८०० स्वस्त धान्य दुकानदारांनी केरोसीनची उचल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्याकडे संघटनेचे दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिन अशोक…

Read More

अनुकंपा नियुक्तांना जुनी पेन्शन लागू करा:जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची ग्रामविकास विभागाकडे मागणी

केंद्र शासनाने अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांमध्ये अर्ज सादर केल्याची तारीख निर्णायक मानून जुन्या पेन्शन योजनेचा (ओपीएस) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनुकंपाधारकांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले आहे. भारत सरकारच्या निवृत्ती वेतन व…

Read More

दिल्लीच्या IAS अकॅडमीच्या संचालकाचे अपहरण:भोपाळमध्ये 4 तास ओलीस ठेवले, पिस्तूल लावून 2 कोटी रुपये वसूल केले; आरोपी अकॅडमीची फ्रँचायझी चालवतो

भोपाळमध्ये ९ गुंडांनी बुधवारी दुपारी दिल्लीच्या IAS अकॅडमीच्या संचालिकेचे अपहरण केले. ४ तास तिला ओलीस ठेवले. कनपटीवर पिस्तूल लावून सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. या घटनेनंतर मास्टरमाइंड प्रियंक शर्मा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, पण रविवारी त्याला भोपाळ एम्समधून पकडण्यात आले. मास्टरमाइंडसोबत ५ साथीदारांनाही पकडण्यात आले आहे, तर ३ आरोपी…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने २३ महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल १५ मिनिटे बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर २५ ठिकाणी चावे घेतले. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर…

Read More

टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मूल्य ₹2.15 लाख कोटींनी वाढले:एअरटेल टॉप गेनर ठरली, मूल्य ₹52,432 कोटींनी वाढले; LIC-बजाज फायनान्सचे मार्केट कॅपही वाढले

जागतिक बाजारातील सुधारलेल्या भावनांमुळे गेल्या आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 2.15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये भारती एअरटेल अव्वल ठरली. कंपनीचे मूल्यांकन 52,432 कोटी रुपयांनी वाढून 11.63 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्याच्या मार्केट कॅपमध्ये 51,675 कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे त्याचे एकूण मूल्यांकन…

Read More

अब्दुल सत्तारांच्या मुलाचा जिल्हा बँकेसाठी अर्ज बाद!:यात काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य न्याय करतील- सत्तार

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची तलवार म्यान करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आला आहे. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, यामागे नेमके कोणते राजकारण दडले आहे हे सांगणे कठीण…

Read More

हिंगोली शहरात हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 511 जणांना 5 लाख 11 हजार रुपयांचा दंड, पोलिस व आरटीओची कारवाई

हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात 511 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची अपघात होत असून हेल्मेट नसल्यामुळे अनेकांना प्राण गमविण्याची वेळ आली…

Read More

ज्येष्ठांसाठी 'आएस्का' मोबाईल ॲपचे लोकार्पण:हे ॲप मदतनीस ठरेल, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांचा विश्वास

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ (एआयएससीए) या संस्थेने विकसित केलेल्या ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी या ॲपचे महत्त्व अधोरेखित करत, हे ज्येष्ठांसाठी एक महत्त्वाचा मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात हे ॲप लाँच करण्यात आले. वृद्धत्व…

Read More