Headlines

आसामच्या इतिहासात सर्वाधिक 85.91% मतदान:पुदुचेरीमध्ये सुमारे 90% मतदान; केरळमध्ये 49 वर्षांतील दुसरे विक्रमी मतदान

देशातील दोन राज्ये, आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झाले. 1950 मध्ये आसाम राज्याची स्थापना झाल्यापासून राज्यात सर्वाधिक 85.91% मतदान झाले. यापूर्वी 2016 मध्ये 84.7% मतदान झाले होते. तर पुडुचेरीमध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक 89.87% मतदान झाले. यापूर्वीचा विक्रम 85% (2006, 2011 आणि 2016 विधानसभा निवडणुका) होता. केरळमध्ये गेल्या 49 वर्षांतील…

Read More

नागपुरात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या:घरात घुसून पैशांसाठी जीव घेतला; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, एकाला अटक

नागपूरच्या कृष्णानगर परिसरात पैशांसाठी एका दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात ही घटना घडली. विलास सुभाष चौधरी (वय २५) याला अटक…

Read More

पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:वारकऱ्यांना अडचणी येणार नाही याची काळजी घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती…

Read More

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More

सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम

शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. पुढील दोन दिवसांत यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोठी मोहीम हाती…

Read More

गावदेवी मार्केटची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी:आगीतील जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा

ठाणे शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षारक्षकाचा कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या दोन जखमी जवानांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल असेही शिंदे यांनी जाहीर केले. आज संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली….

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

संजय गायकवाडांवर FIR दाखल करण्यात अडचण काय?:रोहित पवारांचा सवाल; पवार प्रशांत आंबींसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. याच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर येथील…

Read More