Headlines

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More

भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचा रात्री वीज कार्यालयात अभ्यास:रात्रीचे भारनियमन त्यात बिबट्याची दहशत; दिंडाेरीचे नागरिक व विद्यार्थी त्रस्त

दिंडोरी परिसरातील वाढत्या वीज भारनियमनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात जात रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत अनोखे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी कार्यालयातच अभ्यास केला. अखेर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून भारनियमन रद्द करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. ​निळवंडी रस्त्यावरील जाधव वस्ती, पिंगळे वस्ती, बोरस्ते वस्ती…

Read More

Mukesh Ambani Earns ₹3,996 Cr via Dividends; No Salary for 6th Year

मुंबई14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तेल-दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मधून सलग सहाव्या वर्षीही कोणतेही वेतन (पगार) घेतलेले नाही. कंपनीने जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये मुकेश अंबानी यांचा पगार, भत्ते, अलाउन्स आणि सेवानिवृत्तीचे फायदे पूर्णपणे शून्य राहिले आहेत. सध्या…

Read More

बंगालमधील सिलीगुडी येथे PM मोदींची सभा:3.6 कोटी लोक पहिल्या टप्प्यात मतदान करतील; तामिळनाडूमध्ये राहुल गांधींचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज रविवार दुसरा दिवस आहे. पंतप्रधान आज सिलीगुडी येथे सभेला संबोधित करतील. यावेळी ते दार्जिलिंग जिल्ह्यातील सर्व 5 आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील सर्व 7 जागांवर भाजपच्या उमेदवारांसाठी मते मागतील. यापूर्वी, पंतप्रधानांनी शनिवारी बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा, मुर्शिदाबादमधील जंगीपूर आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुशमंडी येथे तीन सभांना संबोधित केले…

Read More

परिचारिका दिनी परिचर्या क्षेत्राचे महत्त्व, भूमिकेबाबत जनजागृती:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यक्रम‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिचर्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. परिचर्या क्षेत्राचे महत्त्व आणि रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका यावर जनजागृती केली. दिनाचे औचित्य साधून सकाळी महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या परिसरातून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या…

Read More

संसाराची स्वप्ने राहिली अधुरीच:पाटणमध्ये पिकअप-दुचाकीच्या अपघातात नवदाम्पत्य ठार, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि…

Read More

इर्ले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:कै.पाटील यांच्या स्मरणार्थ, 10 वी, 12 वी मधील यशवंतांचा गौरव‎

शिक्षणाचा वारसा जपत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इर्ले येथे पाटील परिवाराच्या वतीने कै. उद्धवरावजी पाटील व कै. अंबादास (नाना) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंतांचा सत्कार व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत यश संपादन करणारे युवक-युवती, शिक्षक तसेच मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी…

Read More

घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी…

Read More

आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, टी-रबी शंकर यांची जागा घेतील

कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने (ACC) रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असेल, जी 3 मे किंवा त्यानंतरपासून प्रभावी मानली जाईल. जैन सध्याचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ आज संपत आहे. रोहित जैन यापूर्वी डिसेंबर 2020 पासून आरबीआयमध्ये कार्यकारी…

Read More

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून, एका ट्रॉलीचा दर तब्बल ५ हजारांवर पोहोचला आहे. पशुधन घटल्यामुळे उपलब्धता कमी झाली असली तरीही शेतकरी दीर्घकालीन फायद्यासाठी शेणखतावरच भर देत…

Read More