Headlines

Latur Pediatrician Dr. Manoj Shirure Arrested in NEET 2026 Paper Leak

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गं . डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून…

Read More

अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली

भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या हेमा मालिनी:म्हणाल्या- मला त्यांची आठवण येते, त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगू हे माहीत नाही

अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. मुंबईत एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला, ज्यात हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांचा प्रवास उत्कटता, समर्पण आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त प्रेमाने भरलेला होता. ते नेहमी हेच म्हणायचे की चित्रपट मनापासून जोडण्याचे माध्यम आहे. त्यांना चित्रपट आणि कॅमेऱ्याबद्दल उत्कट आवड होती. त्यांच्या जीवनसाथी म्हणून, मी…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

शिवराय कुळकर्णी चौथ्यांदा भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी शिवराय कुळकर्णी यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या पुनर्निवडीची घोषणा केली. कुळकर्णी यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना कुळकर्णी म्हणाले, ‘पक्षाची बाजू योग्यरीतीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी…

Read More

23 गावांच्या 'स्ट्रक्चरल प्लॅन'साठी इरादा जाहीर करा:नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पुणे महापालिकेला सूचना

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला 23 समाविष्ट गावांचा संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करण्यासाठी तातडीने इरादा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या गावांच्या नियोजनबद्ध आणि वेगवान विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 14 व्या वार्षिक सर्वसाधारण…

Read More

'शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है':संग्राम जगतापांचा इशारा, म्हणाले – 26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान एका सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत संग्राम जगताप यांनी, “शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है” असा थेट इशारा…

Read More

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे:हे लोकांना विभाजित करते; आधी डेंग्यू, मलेरिया सांगितले होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, लोकांना विभाजित करणाऱ्या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला…

Read More

सुलतानपूरची स्व-जनगणना 100% पूर्ण:भातकुलीनंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला

तिवसा तालुक्यात भारत सरकारच्या स्व-जनगणना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सुलतानपूर गावाने आपली स्व-जनगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण केली आहे. यामुळे भातकुली तालुक्यानंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुलतानपूर गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अल्पावधीत संपूर्ण माहितीची नोंदणी केली. नागरिकांनी स्वतःहून कुटुंबीयांची माहिती ऑनलाइन व अधिकृत माध्यमातून भरून प्रशासनाला सहकार्य…

Read More

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?

ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी…

Read More