Headlines

लाडकी बहिण योजनेत ६४ हजार महिलांनी KYC दुरुस्त केले:यामुळे त्यांना पुन्हा लाभ मिळण्याची आशा बळावली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील सुमारे ६४ हजार महिलांनी त्यांच्या केवायसीमध्ये (KYC) झालेल्या चुकांची दुरुस्ती केली आहे. यामुळे त्यांना येत्या काळात दरमहा दीड हजार रुपये पुन्हा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून ही माहिती समोर आली आहे. चुकीचे निकष निवडल्यामुळे जिल्ह्यातील या महिलांचा लाभ जानेवारी २०२६ पासून बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक…

Read More

‘गिन्नी वेड्स सनी 2’ मध्ये हास्य, प्रेम आणि ट्विस्ट:मेधा म्हणाली- नात्यात एकत्र असणे सर्वात सुंदर, अविनाश म्हणाला- लग्नामुळे जीवनाला उद्देश मिळतो

बॉलिवूड अभिनेता अविनाश तिवारी आणि अभिनेत्री मेधा शंकर यांचा ‘गिन्नी वेड्स सनी 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. ही केवळ प्रेमकथा नाही, तर नातेसंबंध, कुटुंब आणि आजच्या काळातील गुंतागुंत हलक्या-फुलक्या पद्धतीने दाखवते. दैनिक भास्करशी बोलताना मेधा शंकर म्हणाल्या की, पटकथा ऐकताच त्या कथेला जोडल्या गेल्या. गिन्नीचे पात्र त्यांना खूपच संबंधित वाटले, ज्याचे जीवन, प्रेम आणि…

Read More

दिल्ली विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मध्यरात्री आंदोलन:विद्यार्थिनींनी व्यवस्थापनावर हॉस्टेल रिकामे करण्याचा आणि पाणी बंद केल्याचा आरोप केला

दिल्ली विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी हॉस्टेल फॉर वुमेन (UHW) मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी गुरुवारी रात्री कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन केले. विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) नुसार, विद्यार्थिनी रात्री सुमारे 9:30 वाजल्यापासून रस्त्यावर बसल्या होत्या आणि आंदोलन मध्यरात्रीनंतरही सुरू राहिले. आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनावर जबरदस्तीने वसतिगृह खाली करण्यास सांगणे, मूलभूत सुविधा बंद करणे आणि अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात…

Read More

वडाळीभोईतील हायवे मॉल ग्रामीण व्यापाराला नवी दिशा देणारा ठरेल:चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेर यांचे प्रतिपादन‎

वडाळीभोई येथे उभारण्यात येणारे भव्य व्यापारी संकुल (हायवे मॉल) परिसरातील व्यापाराला नवी दिशा देणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वडाळीभोई व वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

पंचायत विकास आराखडा ऑनलाईन प्रशिक्षणाला जि.प. विभागप्रमुखांची उपस्थिती:"सर्वांची योजना-सर्वांचा विकास" अंतर्गत नियोजन प्रक्रियेवर मार्गदर्शन

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गुरुवारी “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रियेवर आधारित या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले….

Read More

पुण्यात 28 जूनला समरसता लोककला संमेलन:पद्मश्री रघुवीर खेडेकर अध्यक्ष, मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

पुण्यात २८ जून २०२६ रोजी ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व…

Read More

बुधवार पेठेतील ४ कुंटणखाने सील:अनैतिक व्यापार प्रकरणी ३ बांगलादेशी महिलांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘न्यू वेलकम’, ‘बेगम बिल्डिंग’ आणि ‘दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले…

Read More

मराठी न येणाऱ्या 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस:परिवहन विभागाची मोठी कारवाई; भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगाची मुभा नाही

राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत 604 चालकांना पहील्याच दिवशी नोटीस मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. परिवहन मंत्री…

Read More

अंजनगाव बारीत घरांचे नुकसान; वीज वाहिन्या तुटून पुरवठा खंडीत:अचानक बदललेल्या वातावरणामुळे उभ्या कांदा पिकांचे मोठे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. अचानक झालेल्या या अवकाळी बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकांना मोठा फटका बसला असून गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी…

Read More