अमरावती जिल्ह्यात पाऊस कमी, सरासरीच्या 72% पर्जन्यमान:मोर्शी धरणात 4.5% जलसाठा कमी, पाणीटंचाईची भीती
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू असला तरी, त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या उघडीपमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर वार्षिक सरासरी गाठण्याच्या जवळ पोहोचलेले पर्जन्यमान पुन्हा खाली घसरले असून ते ७२.६ टक्क्यांवर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यातही घट झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा (सिंभोरा) धरणातील जलसाठा…