Headlines

महाराष्ट्रासह गुजरातेत आज मुसळधार पावसाचा इशारा, सेना सज्ज:गुजरातेत शाळा-कॉलेज बंद; हरिद्वारमध्ये गंगा धोक्याच्या पातळीवर

जुलै महिना संपता संपता संपूर्ण देशभरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुजरात, सौराष्ट्र-कच्छ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत 204mm पेक्षा जास्त पाऊस. तर पंजाब, अरुणाचल, केरळ, कोकण-गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटकात ऑरेंज अलर्ट आहे. दरम्यान, गुजरातमध्ये आज सर्व शाळा-महाविद्यालय बंद राहतील. हवामान विभागाच्या…

Read More

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची कसरत:शिवना येथील ग्रामपंचायतीसमोरच पावसामुळे दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे

शिवना ग्रामपंचायतीच्या तिजोरीत दरवर्षी विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. ई-ग्रामस्वराज्य प्रणालीवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या उत्पन्नासह तब्बल ४ कोटी १० लाख ५९ हजार २८३ इतका निधी जमा झाला होता. यापैकी जलनिस्सारण, गटार व नालेसफाई, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा दुरुस्ती, ड्रेनेज वर्क, अंगणवाडी व सार्वजनिक स्वच्छतागृह सफाई यांसारख्या कामांवर २ कोटी…

Read More

चितेगाव-पांगरा रस्त्याची दुरवस्था:विद्यार्थ्यांचे हाल, पालकांकडून संताप व्यक्त

परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चितेगाव-पांगरा आणि चितेगाव-बोकूडजळगाव या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गांवर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून, शालेय विद्यार्थी, वाहनचालक आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पाण्याखालील खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे….

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत 37% शेतकऱ्यांचीच ‘ई-केवायसी’ पूर्ण

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी २९ जुलैअखेर अवघ्या ३९ हजार २६६ (३७%) शेतकऱ्यांचीच ‘ई-केवायसी’ पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना कर्ज रकमेत असलेली तफावत, वेगवेगळ्या बँकांचे कर्ज, केंद्रचालकांकडून केली जाणारी अडवणूक यामुळे केवायसीच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे. ६५,८६२ शेतकरी अजूनही केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या शेतकऱ्याला…

Read More

भंडाफोड:कोल्हापुरात डॉक्टरने केले 200 हून अधिक बेकायदेशीर गर्भपात, डमी रुग्णाच्या साहाय्याने उघडकीस आला प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कदमवाडी रोडवरील “प्रतिमा हॉस्पिटल’वर पोलिसांनी छापा टाकून डॉ. चंद्रकांत गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक चौकशीत या डॉक्टरने आतापर्यंत २०० ते २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड याने यापूर्वी विविध जिल्ह्यांत सिव्हिल…

Read More

री-नीटचा निकाल योग्य असल्याचे सिद्ध:4 विद्यार्थ्यांना खंडपीठाचा दंड, पाहणीत मूळ उत्तरपत्रिका अन् एनटीएचे गुण तंतोतंत जुळले

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या री-नीटच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या ४ याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५,००० रुपये दंडात्मक खर्च ठोठावला आहे….

Read More

मंत्र्यांच्या दालनात ई-पेपर; 1 सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्रे बंद:राज्य सरकारचा निर्णय, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि खर्चाच्या बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांत तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. सामान्य…

Read More

हात आहेत, पण पायांवर चालते वंदनाचे जीवन:शरीराला थरकाप, जीभही साथ देत नाही; अखेरची इच्छा- अमिताभ बच्चनची भेट घेणे

दुर्मीळ आजारांच्या मालिकेतील- ‘ऐ जिंदगी’ मध्ये आज वंदना कटारियाची कहाणी. यासाठी मी नीरज झा गुजरातच्या जैतपूर शहरात पोहोचलो आहे- वेळ- संध्याकाळचे साधारण 4 वाजले होते. मुसळधार पाऊस पडत होता. जैतपूरच्या अरुंद गल्ल्यांमधून जाताना एका व्यक्तीला विचारले- वंदना कटारियाचे घर कुठे आहे? त्याने एका जुन्या तीन मजली इमारतीकडे बोट दाखवत सांगितले- कोपऱ्यावरचे ते दुकान वंदना दीदींचे…

Read More

आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले:सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’तून राज्यातील ९४,०८३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कारण सहकार विभागाने ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांची डेटा पडताळणी केली. त्यात हे शेतकरी आयकरदाते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपात्रतेमुळे राज्य सरकारचे १,८८१ कोटी ६६ लाख रुपये वाचले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने ३६,५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय…

Read More

नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के:6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत. गुरुवारच्या भूकंपाचा…

Read More