Headlines

कदमापूर जि.प. शाळेत 5 मिनिटांत 40 पालकांपर्यंत थेट शिक्षण संवाद:शिक्षक राजेश कोगदे यांची संकल्पना; शालेय प्रगतीचे ‘ड्रीप इरीगेशन’‎

आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब . शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रमाणात पाणी पोहोचवून त्याची वाढ सक्षम केली जाते. याच धर्तीवर शिक्षक कोगदे यांनी…

Read More

दिव्य मराठी एक्सपोझ:डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात ओढून तरुणांचा शारीरिक छळ, लूटही, ‘शिकार’ हेरण्यासाठी साेलापुरात टोळी सक्रिय

डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणारी आणि त्यांची लूटमार करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बदनामीच्या भीतीचा अस्त्र म्हणून वापर करत, या टोळीने अनेक तरुणांना आपला शिकार बनवले आहे. मात्र, नुकत्याच एका पीडित तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे विजापूर नाका पोलिसांनी या टोळीतील 5 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात बदनामी होईल, या दहशतीखाली अनेक तरुणांनी अन्याय…

Read More

मोकाट जनावरांमुळे पालक संतप्त:ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात पसरली नाराजी‎

येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेसमोरील चावळी चौकात भटक्या व मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस वाढत असलेला वावर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळेत मोठ्या संख्येने गायी, बैल व वासरे शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आणि रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने चिमुकल्या विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करावी लागत आहे. प्रत्यक्ष पाहणीत शाळेच्या…

Read More

देशाच्या 70% भागात ढगाळ वातावरण:25 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट; राजस्थानच्या 3 जिल्ह्यांतील पारा 41 डिग्रीच्या वर

इस्रोच्या उपग्रह प्रतिमांनुसार, देशाच्या सुमारे 70% भागावर मान्सूनचे ढग दाटले आहेत. पुढील 25 जुलैपर्यंत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतासह देशाच्या 60% पेक्षा जास्त भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 24% कमी आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने विश्रांती घेतल्याने उष्णता वाढू लागली आहे. बिकानेर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये रविवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले….

Read More

विठुरायाच्या भेटीला निघाले 41 वारकरी:मोर्शी आगारातून विशेष बस पंढरपूरकडे रवाना, 29 महिला भाविकांचा समावेश‎

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल असा एकच गजर, मनात विठुरायाच्या भेटीची आस आणि पंढरपूरच्या दिशेने वेगाने धावणारे मन अशा स्थितीतील मोर्शी येथील ४१ वारकरी एकत्रितपणे पंढरपूरकडे एकाच पंढरपूर वारी स्पेशल या एकाच एसटी बसने रवाना झाले. वारकरी पंढरपूरकडे निघण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी एकाच गावातील वारकरी एकाच एसटीतून पंढरपूरकडे निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, 5 जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर…

Read More

स्टील दुकानाच्या आडून चालणाऱ्या तांबे चोरीचा जामखेड पोलिसांकडून पर्दाफाश:शेती पंपाच्या 1,635 किलो तांब्याच्या तारांसह दुकानमालक पोलिसांच्या जाळ्यात‎

शहरातील तपनेश्वर रोडवरील एका नामांकित स्टील आणि भांड्याच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी गुरुवारी (१६ जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना दुकानातून शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या सोललेल्या तारांचे लहान-मोठे तुकडे असलेल्या तब्बल ३९ गोण्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या १,६३५ किलो तांब्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये आहे….

Read More

रात्रभर चालले CJP चे आंदोलन, बॅरिकेडिंग तोडली:वांगचुक यांच्या पत्नीही पोहोचल्या, लोक रस्त्यावर झोपले; 14 PHOTOS-VIDEOS

कॉकरोच जनता पार्टी (CJP) सकाळी 9 वाजता जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत ‘चलो संसद’ मोर्चा काढणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. जंतर-मंतरवर 10 हजार आंदोलक जमले आहेत. आंदोलन रात्रभर सुरू होते. लोक मध्यरात्रीपर्यंत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचत राहिले. सोमवारी सकाळी सुमारे 5.30 वाजता आंदोलकांनी पोलिसांची बॅरिकेडिंग तोडली. पाहा 14 फोटो-व्हिडिओ…

Read More

वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा जागर

आषाढी वारीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माला समाजप्रबोधनाची जोड देत शहरात अवयवदान चळवळीबद्दल जनजागृती करण्यात आली. नेत्रदान व अवयवदानासाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान समुपदेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न…

Read More

नसीरुद्दीन शाह@76: पाक मुलीशी केले लपून लग्न:मित्राने मत्सरापोटी चाकू खुपसला; आईने विचारले होते- रत्ना मुस्लिम होईल का?

ही 1960 च्या दशकातील गोष्ट आहे. एक सडपातळ मुलगा होता. त्याला अभिनेता बनण्यासाठी मुंबईला जायचे होते. एके दिवशी त्याच्या एका मित्राच्या मैत्रिणीचे पत्र आले की, मुंबईला ये, माझे वडील चित्रपटांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, ते तुला मदत करतील. त्यानंतर तो मुंबईला निघाला. मात्र, ज्या मुलीच्या भरवशावर तो मुंबईला पोहोचला, ती स्वतः खूप साधे जीवन जगत होती….

Read More