Headlines

बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीत खोदकाम सुरू:7 किलोमीटरचा मार्ग जाणार पाण्याखालून, भारतातील पहिला खाडीखालचा रेल्वे बोगदा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता जबरदस्त वेग मिळाला असून, देशातील पहिल्या खाडीखालच्या रेल्वे बोगद्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये एका भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने हे खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. बुलेट ट्रेनसाठी आता…

Read More

अभिषेक म्हणाले- बंगालमध्ये पोलिसांच्या गणवेशात चोरी:माझे कार्यालय पाडले, भाजपचे गुंड सामान घेऊन गेले; केस प्रलंबित असताना बुलडोझर कारवाई का?

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला की, भाजप सरकारच्या काळात पश्चिम बंगाल पोलीस स्वतःच कायदा मोडणारे बनले आहेत. दक्षिण 24 परगणा येथील अमतला येथील त्यांचे कार्यालय पाडल्यानंतर एक दिवसांनी त्यांनी हे विधान केले. शनिवारी जिल्हा प्रशासनाने इमारतीचा पुढील भाग बुलडोझरने पाडला होता. हे बांधकाम परवानगीशिवाय केले असल्याचा आरोप होता. इमारत पाडल्यानंतर रात्रीचा एक…

Read More

मुंबई कोस्टल रोडवर 'पोर्शे'चा भीषण अपघात:भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि…

Read More

राम मंदिर देणगी चोरीवर राहुल यांचे मोदींना पत्र:म्हटले – तुमची शांतता स्वीकारार्ह नाही, ट्रस्टची खाती सार्वजनिक करा; टिन्नूची आजही चौकशी

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. खाती सार्वजनिक करावीत, जेणेकरून प्रत्येक भक्ताला कळेल की देणगीचा वापर कुठे आणि कसा झाला. चौकशीत जे कोणी जबाबदार आढळतील, त्यांची चौकशी निश्चित करावी….

Read More

राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली:त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही. नवनाथ…

Read More

पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक:विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले; बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठक सकाळी 11 वाजता संसद भवन ॲनेक्सीमध्ये झाली. बैठकीत काँग्रेस, सपा, टीएमसी, द्रमुक (DMK) सह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र 15 मिनिटांनंतर विरोधी खासदार बाहेर पडले आणि त्यांनी बैठकीतून सभात्याग केला. विरोधी खासदारांचा आरोप आहे की, सरकारने टीएमसीच्या बंडखोर 20 खासदारांच्या गटाला…

Read More

उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार?:श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले- वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी म्हणून रुग्णालयात हलवले

उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे…

Read More

Aamir Khan Security Increased In Mumbai After Threat

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खानला तिसरे लग्न केल्याबद्दल मिळालेल्या कथित धमकीबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी व्हॉइस क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी वांद्रे पश्चिममधील पाली हिल येथील आमिर खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. मात्र, आमिर खान सध्या देशाबाहेर आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप व्हॉइस क्लिप किंवा सोशल…

Read More

वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही:नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण, वांगचूक प्रकरणावरही भाष्य

“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत चौफेर…

Read More

मतदार यादीपूर्ण करा, कर्जमाफी वीज माफीचे आश्वासन सरकारने पाळले:राहुरीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन‎

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. ही केवळ प्रशासनाची मोहीम नसून, मतदार यादी त्रुटीरहित करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या कामात निष्काळजीपणा केल्यास मतदारांचे नाव कमी होऊ शक . मंत्री विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली असून जुलैअखेर रकमा…

Read More