आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा:अहिल्यानगरमधील घटना, केमिकल्सने आंबे पिकवल्याचा संशय
मुंबईत गेल्या महिन्यात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव येथे आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाली आहे. हे आंबे कृत्रिमरीत्या धोकादायक केमिकल्स वापरून पिकवले असल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त…