Headlines

बोगस बियाणे, दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी ‘अन्नत्याग’:न्यायालयीन लढाईसाठी सत्ताधारी शिंदे सेना करणार सहकार्य‎

बोगस बियाणे व दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढल्यास सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे. शेतकरी एल्गार समितीवतीने अन्नदात्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन” पुकारण्यात आले आहे. बार्शीटाकळी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेत…

Read More

Annu Kapoor Interview | Struggle Journey Bollywood Uttar Da Puttar

56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर सध्या आपल्या ‘उत्तर दा पुत्तर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट अत्यंत संवेदनशील पण उपरोधिक पद्धतीने माणसाच्या सर्वात मोठ्या संभ्रमावर, ‘कर्म मोठे की नशीब’ यावर प्रश्न विचारतो. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना अन्नू कपूर यांनी आपल्या अपूर्ण स्वप्नांवर, बॉलिवूडमधील संघर्षावर, सोशल मीडियाच्या अंधश्रद्धेवर आणि आयुष्यातील कटू अनुभवांवर…

Read More

टीव्हीच्या दुनियेतून:'इन्स्पेक्टर मंजू'ने मालिका सोडली?; अखेर मोनिका राठीने सांगितले खरे कारण, डोळ्यांत लाल तिखट गेले अन्…

मालिकेतील मुख्य कलाकाराच्या तब्येतीमुळे अनेकदा कथानकात बदल करावे लागतात. मात्र, हे बदल करतानाही प्रेक्षकांचे मनोरंजन कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेने हे अगदी सहज साध्य केले आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्याने तिची दृष्टी गेल्याचे दाखवण्यात आले. या ट्रॅकमुळे काही दिवस…

Read More

लाखनवाड्यात डोंगरावर गारगोट्यांची रहस्यमय ‘चादर’:50 मीटर परिसरात लाखो गारगोट्या; अभ्यासकांकडून भूगर्भ शास्त्रीय संशोधनाची परिसरातील नागरिकांची मागणी

तालुक्यातील लाखनवाडा येथे डोंगर पठारावरील एका विशिष्ट सपाट परिसरात गार गोट्यांचा प्रचंड साठा आढळून आला असून, या नैसर्गिक वैशिष्ट्याने नागरिकांसह अभ्यासकांचेही लक्ष वेधले आहे. सुमारे ५० मीटर व्यासाच्या या भागात विविध रंगांच्या लाखो गारगोट्यांनी जमिनीवर जणू काही चादर अंथरल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे या परिसराच्या आजूबाजूला किंवा जमिनीच्या आत अशा प्रकारच्या गार गोट्या आढळत…

Read More

मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका:बच्चू कडूंचे मंत्र्यांसमोरच मोठे विधान, शिवसैनिकांना केले थेट आवाहान

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना आगामी राजकीय स्थिती व संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. मात्र याचवेळी भाषण करताना, मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय…

Read More

पुण्यात ‘ऑरेंज इकॉनॉमी’ एक्स्पोचे आयोजन:भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भवितव्य उलगडणार, 30 व 31 मे रोजी

पुण्यात ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आणि ३१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे हा एक्स्पो पार पडणार असून, यातून भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे (सर्जनशील अर्थव्यवस्था) भवितव्य उलगडणार आहे. ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता आणि डिजिटल…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More

मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन‎

“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम‎:बालसुरक्षा, सायबर सुरक्षा अन् कायदेविषयक जागृती अभियान

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती आणि न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल, बालाजी नगर, मोतीनगर वॉर्ड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका जयश्री आसलकर, सहायक अधीक्षक, न्यायपरिरक्षक कार्यालय, अमरावती येथील ॲड. प्रीती मोहता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयंसेवक मोना खोब्रागडे, यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

संसदेचे पावसाळी अधिवेशन:संसदेबाहेर NDA आणि इंडिया ब्लॉकच्या खासदारांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी; नीट पेपरफुटीवर गदारोळाची शक्यता

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी संसद भवन परिसरात एनडीए आणि विरोधक आमनेसामने आले. भाजपसह एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी मकर दरवाजासमोर राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. एनडीए पंतप्रधान निवासस्थानाबाहेर २१ जुलै रोजी राहुल गांधींच्या धरणे आंदोलनाचा निषेध करत आहे. दुसरीकडे विरोधी खासदारांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. संसदेत आज सलग चौथ्या दिवशी नीट पेपरफुटी…

Read More