Headlines

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली रिक्त पदे भरणे आणि आगामी रणनीती आखण्यावर खलबते झाली. या बैठकीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती वादग्रस्त प्रकरणानंतर बाजूला झालेल्या रुपाली चाकणकर…

Read More

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिकेचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह:हत्येची शक्यता; घर बाहेरून बंद होते; पतीपासून वेगळ्या राहत होत्या

दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल (45) यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळला. त्या पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील फ्लॅटमध्ये एकट्या राहत होत्या. त्यांची बहीण देवरती पॉल यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळपासून त्या फोन उचलत नव्हत्या. जेव्हा त्या फ्लॅटवर पोहोचल्या, तेव्हा दरवाजाला बाहेरून कुलूप होते. त्यांनी कुलूप तोडले आणि आत जाऊन पाहिले असता,…

Read More

एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई‎

अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी…

Read More

दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता:कांद्याला दीड नाही 3 हजार रुपयेच भाव द्या, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व…

Read More

बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा 'महाराष्ट्रातील' नव्हे, तर 'देशातील' पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास सर्वश्रुत आहे. परंतु, बालभारतीने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ असा संकुचित करून ऐतिहासिक चूक केली होती. यावर शिक्षक संघटना आणि नेत्यांनी…

Read More

काकरोच पार्टीचे संस्थापक दीपके पोलिसांच्या पाया पडले:जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी मागितली, म्हणाले- विद्यार्थ्यांना पावसापासून वाचवायचे आहे

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. गुरुवारी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते पोलिसांसमोर हात जोडताना आणि पाय धरताना दिसत आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, आंदोलन करणारे आणि उपोषणावर बसलेले विद्यार्थी पावसात भिजत आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांकडे जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी…

Read More

जायकवाडी धरणामध्ये गतवर्षी 75 तर यंदा केवळ 31.49% जलसाठा:गतवर्षी याच काळात पाच वेळा गोदापात्रात पाणी सोडले‎

जुलैचा मध्य उलटून गेला तरी जायकवाडी धरणात अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही. गतवर्षी याच काळात धरणात प्रतिसेकंद ५२ हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी येत होते. गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत धरणाचा साठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणातून दोन मह . धरणात सध्या ६८३.५३९ दलघमी म्हणजेच केवळ ३१.४९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची सध्याची…

Read More

ममता बॅनर्जींविरुद्ध कोलकातामध्ये FIR:निवडणूक प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप; पुतण्या अभिषेकच्या घरी सीआयडी पोहोचली

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कोलकाताच्या हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ममता यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी ९ मार्च रोजी निवडणूक प्रचारादरम्यान भडकाऊ भाषण दिले होते. ही तक्रार तुषार कांती दास यांनी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ममता यांच्या विधानामुळे जातीय सलोखा आणि राज्याच्या लोकशाही व्यवस्थेला हानी…

Read More

कामगार कल्याणासाठी सरकारचा मोठा निर्णय!:40 वर्षांवरील वयोगटातील कामगारांची आता दरवर्षी होणार आरोग्य तपासणी

नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ करण्यात आला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त…

Read More

विद्यापीठीय कर्मचारी 18 मे पासून आंदोलन करणार:प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाविरुद्ध एल्गार

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी १८ मे पासून साखळी आंदोलन सुरू करणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती’चे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जळगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात…

Read More