2022 नंतर पक्ष कमजोर झाला होता:उद्धवसाहेब, तुमचं ठीक; पण आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रभर फिरवा म्हटलं होतं; बंडू जाधव पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर आता पक्ष सोडलेल्या खासदारांकडून एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी परभणीचे खासदार संजय ऊफ बंडू जाधव यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मौन सोडत पक्ष सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचं सांगतानाच, संघटनेकडे झालेलं दुर्लक्ष आणि स्थानिक राजकारणामुळे…