Headlines

पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश

पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी)…

Read More

औराळा आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज इमारत बांधा:ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले निवेदन‎

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून, ती तातडीने पाडून तेथे नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १० जुलै रोजी प्रत्यक्ष भेटीत निवेदन देण्यात आले. औराळाआरोग्य केंद्राची जुनी इमारत दयनीय अवस्थेत आहे. चालू पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असून भिंतींना मोठे…

Read More

भारताला रशियन तेलावर अमेरिकन सवलत मिळणार नाही:यूएस ट्रेझरी सेक्रेटरी म्हणाले- जनरल परवाना नूतनीकरण होणार नाही; 11 एप्रिलपर्यंत दिलासा मिळाला होता

अमेरिकेने रशिया आणि इराणकडून तेल खरेदीवर दिली जाणारी सूट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही रशियन तेलावर दिलेली सूट नूतनीकरण करणार नाही. यापूर्वी मंगळवारीच ट्रेझरी विभागाने इराणी तेलावर मिळणाऱ्या सवलतीवरही बंदी घातली होती. व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना बेसेंट म्हणाले की, आम्ही रशियन आणि इराणी तेलावर…

Read More

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर…

Read More

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…

Read More

खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर:अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप; भोंदूबाबा प्रकरणात पोलिस यंत्रणेलाही फटका

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असलेल्या या प्रकरणात आता थेट पोलिस प्रशासनालाही धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे प्रकरणात मोठी…

Read More

तस्करीने अमेरिकेत पोहोचलेल्या 120 कोटींच्या मूर्ती भारतात परतल्या:भारतीय नौदलाला स्वदेशी फ्रिगेट महेंद्रगिरी मिळाले; 2 मेच्या चालू घडामोडी

जाणून घ्या आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. माजी न्यायाधीश अनुपिंदर सिंग ग्रेवाल NCLT चे अध्यक्ष बनले 30 एप्रिल रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अनुपिंदर सिंग ग्रेवाल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी…

Read More

परसवानी कुटुंबाचा 14 दिवसांनी शोध, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले:कर्जाला कंटाळून सोडले होते घर, भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा शोध अखेर १४ दिवसांनी लागला आहे. हे कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रचंड कर्ज आणि कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. कर्जदार पैशांसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावत होते….

Read More

हर्षवर्धन सपकाळांकडून पंतप्रधानांवर अर्वाच्य भाषेत टीका:चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- सपकाळांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारी

नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेच्या निषेधार्थ आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…

Read More

पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले….

Read More