अन्नछत्र मंडळाकडून 300 हून अधिक वृक्षांची जोपासना:6 वर्षांचे सातत्य, सोलापूर रस्ता बनला हिरवागार
‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ हा मंत्र जपत जगप्रसिद्ध संस्था उभी करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी आता पर्यावरणाच्या संवर्धनातून अक्कलकोटचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून लावलेली झाडे आज डौलाने बहरली असून, हा मार्ग सुखद आणि हिरवागार झाला आहे. हरवलेले वैभव परत…