आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू
ओझर विमानतळावरून शारजाहसह इतर आखाती देशांमध्ये जिवंत बोकड आणि मेंढ्यांच्या निर्यातीला येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गती मिळाली आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवरही झाला होता. यामुळे दोन महिने निर्यात थंडावली होती. मात्र, याच आठवड्यात 1100 बोकड कार्गो विमानाद्वारे निर्यात झाले आहेत. नाशिकचा कांदा, द्राक्ष, डाळिंब, फुलांनंतर आता येथील बोकडांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषत:…