सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना
राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे….