Headlines

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎




प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात मार्गदर्शन करीत होते. पू. राजेशकृष्ण महाराज यांनी रुक्मिणी विवाहाची कथा प्रतिपादित करताना कृष्ण व गोपिकांच्या दैवी प्रेमाची कथा सांगितली. ते म्हणाले प्रेम हे भक्तिमार्गातला महत्त्वाचा टप्पा आहे. भक्त जोपर्यंत प्रेम शिकत नाही; तोपर्यंत तो ज्ञानी होऊ शकत नाही. त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सर्वांवर, स्वतःवर, जगण्यावर, मुक्या प्राण्यावर प्रेम करा. यामुळेच भगवंत प्राप्तीचा खरा मार्ग आपणास मिळू शकेल, असेही ते म्हणाले. या कथेत आमदार वसंत खंडेलवाल यांनी सपत्नीक आपली दर्शवून आरतीत सहभाग घेतला. त्यांचे स्वागत समाज ट्रस्ट अध्यक्ष विजय तोष्णीवाल, महिला मंडल अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, समाज ट्रस्टचे प्रधानमंत्री विजय राठी, नरेश बियाणी, देवानंद लढ्ढा, सीए मनोज चांडक, राजेश लोहीया, प्रा. महेश मुंदडा, प्रा. डॉ. रमण हेडा, पवन बंग, कुंजबिहारी चांडक, गिरीश तोष्णीवाल, प्रदीप राठी, प्रकाश चितलांगे आदींनी केले. या उत्सवात कथेचे मुख्य यजमान मीना टावरी, किशोर लाहोटी, कृष्णा लाहोटी, पोथी यजमान अनुराधा आशीष बाहेती, अनुसया कुंजीलाल जाजू, निधी पंकज कोठारी, आरती यजमान शिला शरद चांडक, रेखा प्रमोद चांडक, मनीषा चेतन चांडक, वंदना विनय मंत्री, दीपा आलोक सारडा यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. संचालन महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आरती जाजू यांनी केले. दुपारी कथास्थळी होम हवन सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडले. या कथा उत्सवाचा सर्व महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनिता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले. पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी वृंदावन सोडून प्रदुमन समवेत भगवंत मथुरेला येण्याची सुरस कथा सांगितली. मथुरेला जाताना गोपीकांचा विरह त्यांनी कथन केला. त्याचबरोबर द्वारका प्रसंग ही आपल्या सुरस वाणीतून चितारला. या सत्रात त्यांनी कृष्ण रुक्मिणी विवाहाची सुंदर झाकीयुक्त गाथा, महारास, उद्धव गोपी संवाद आपल्या संगीतमय भजनानी सादर केली. यावेळी माहेश्वरी भवन फुलांनी सजवण्यात आले होते. कृष्ण रुक्मिणीची वरात भवनात काढण्यात आली. या झाकीवर उपस्थित महिला पुरुषांनी पुष्पांची उधळण करीत जल्लोष व नृत्य सादर केले. पंडित वर्गाने रुक्मिणी विवाहात मंत्रोच्चार केला. या झाकीत कृष्ण जयेश टावरी, रुक्मिणी वैभवी, जयेश टावरी बनली. बालकृष्णच्या रुपात मनुश्री बजाज तर फुलांची होळीमधील कृष्ण रुपात राधिका निकुंज हेडा व राधा मेघा रूपेश राठी बनली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *