![]()
प्रतिनिधी | पाळधी
‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ या अभंगातील ओळींचा संदर्भ देत साध्वी सोनाली दीदी करपे यांनी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा पार पाडली. वडिलोपार्जित संपत्तीसोबतच वडिलांनी दिलेले संस्कार, समाजसेवा आणि चांगल्या कार्याचा वारसाही पुढे नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. युवतींना धर्म, संस्कार, कुटुंबाच्या प्रतिष्ठेप्रती निष्ठावान राहण्याचे आवाहन त्यांनी केले. क्षणिक आकर्षण, चुकीचे निर्णय आणि दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहून जीवनातील प्रत्येक निर्णय विवेकाने घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला. साध्वींच्या अभ्यासपूर्ण, ओजस्वी आणि समाजप्रबोधनपर कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजसेवा, धर्मकार्य आणि वारकरी संप्रदायाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. सेवाकार्याचा वारसा पुढील पिढीने जपणे हीच खरी संतसेवा आहे, असे प्रतिपादन त्यांनी पाळधी येथील या किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून केले आहे. यांची होती विशेष उपस्थिती गोप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर, यज्ञेश महाराज माळी, कैलास महाराज पवार, मयूर महाराज दरेकर, परमेश्वर महाराज पारधीकर, निंबा महाराज वाघडूतकर, अनिल महाराज एकलग्नकर, गोपाल महाराज दापुरेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज आणि अन्य पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.
Source link
वडिलांच्या संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा जपा- साध्वी सोनालीदीदी:पाळधीला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात भाविकांना आवाहन