![]()
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषण करत आहेत. दुर्गम गावांमधून शहरात शिक्षणासाठी येणारे अनेक विद्यार्थी सरकारी वसतिगृहांवर अवलंबून आहेत. मात्र, वसतिगृहांच्या नियमांमुळे त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. ३० वर्षांच्या वयोमर्यादेचा मुद्दा सरकारी आदिवासी वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वसतिगृहात राहत असताना या नियमामुळे त्यांच्यावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या वैद्यकीय तपासणीवरही आक्षेप वसतिगृहातील सुविधांचा अभाव, अन्न, स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या यांचाही विद्यार्थ्यांनी उल्लेख केला आहे. विशेषतः दीर्घकाळ गैरहजर राहिल्यानंतर वसतिगृहात परतणाऱ्या विद्यार्थिनींची गर्भधारणा चाचणी आणि इतर वैद्यकीय तपासण्या केल्या जात असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी पत्रात उपस्थित केला आहे. अशा नियमांमुळे विद्यार्थिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘विद्यार्थी भीक मागत नाहीत, हक्क मागत आहेत’ आदिवासी विद्यार्थी सरकारकडे कोणतीही दया किंवा मदत मागत नसून, शिक्षणाचा आणि सुरक्षित वातावरणाचा त्यांचा हक्क मागत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. वसतिगृहांमध्ये सुरक्षितता, अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांशी संबंधित प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. राहुल गांधींचे पत्र.. हेही वाचा.. FDA ची राज्यभर धडक कारवाई: मुंबई क्रिकेट असोसिएशनसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित, 45 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
विद्यार्थी दान नाही, हक्क मागत आहेत:आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले- विद्यार्थ्यांना भेटा अन् तातडीने प्रश्न सोडवा