Headlines

संजय राऊतांना खिमा पाव प्रिय, वडापाव नकोसा:मोदी पाणी प्या म्हणाले तर राऊतांना झिंग चढली, नवनाथ बन यांचा हल्लाबोल




संजय राऊत यांना अलिकडच्या काळात खिमा पाव जास्त प्रिय वाटायला लागला आहे. त्यांना वडापाव प्रिय वाटत नाही. मत्स पावच्या माध्यमातून कोळी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असतील तर संजय राऊत यांना काय समस्या आहे, मत्सपावचे स्वागत त्यांनी करायला हवे. कोकणी, कोळी माणसांना विरोध करत खिमा पाव खाणाऱ्यांची साथ राऊत मिळवू पाहत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. सरकार रेड्याचा बळी देऊन नाही तर उबाठाचा बळी घेत सत्तेवर आले आहे. जनतेने उबाठा गटाचा बळी घेतला आहे. नवनाथ बन म्हणाले की, आसाममध्ये निघालेल्या तुफानातून काँग्रेस भुईसपाट झाली आहे. आर्थिक तुफान सांभाळण्यासाठी मोदी सक्षम आहे. राहुल गांधींना त्यांचा पक्ष चालवता येत नाही, त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. नीट पेपरफुटी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगलेले नाही. काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचे पेपरफुटी प्रकरणात थेट संबंध दिसून येत आहे. विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणाऱ्यां कोणालाही सोडणार नाही. राऊतांनी झिंग चढल्यासारखे वागू नये नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पाणी पिण्याचे आवाहन केल्यानंतर जनाब संजय राऊत यांना झिंग चढली आहे. कारण मविआचे सरकार असताना पाण्याला विरोध करत दुकानात वाईन विक्री सुरू केली होती. पाण्याला विरोध करायचा आणि दारू विक्री करायची हे मविआचे धोरण होते. मोदींना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देता येत नसेल तर किमान झिंग चढल्यासारखे बोलू नका. तुम्हाला वेगळीच नशा चढलेली दिसते. राऊतांनी झिंग चढल्यासारखे वागू नये. देशरत पुरेसा इंधंनसाठा नवनाथ बन म्हणाले की, भारताकडे पुरेसा इंधंनसाठा शिल्लक आहे. काही लोकं जाणीवपूर्वक डिझेल आणि पेट्रोलचा साठा करत आहेत. काही जिल्ह्यामध्ये 50 टक्के मागणी वाढली आहे ती का वाढली आहे. कारण काही जण साठेबाजी करत पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर दर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. मतांसाठी राऊतांकडू कुर्बाणीचे समर्थन नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षाची चिंता करावी त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांच्या पक्षाचे 54 आमदार आहेत. तुम्ही 90 जागावर उमेदवार उभे केलेत आणि तुम्हाला 20 आमदार सुद्धा निवडून आणता आले नाहीत. बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्यास आमचा विरोध नाही.पण बळी कुठे द्यायचा? सार्वजनिक ठिकाणी बळी देण्सास आमचा विरोध आहे. मतांसाठी रस्त्यावर, सोसायटीमध्ये बळी दिले जातात त्यांचे समर्थन राऊत करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी राऊतांच्या पेकाटात लाथ घातली असती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *