सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर रस्ता 5 वर्षांपासून रखडला:पुलाचे काम पूर्ण, प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी त्रस्त
सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा आठ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, रोजंदारी कामगार, नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. हा रस्ता सध्या खड्डेमय आणि धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. काही ठिकाणी रस्ता…