Headlines

‘घाटी’त 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!:उन्हाळ्यामुळे शिबिरे झाली ठप्प, खासगी पेढ्यांतही रक्ताच्या पुरवठ्याची अडचण

उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या घाटीत केवळ १५० बॅग रक्त शिल्लक असून हा साठा अवघे ३ ते ४ दिवस पुरेल इतकाच आहे. हीच परिस्थिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतही आहे. रक्तटंचाईचा परिणाम शस्त्रक्रियांवर होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटते. मात्र,…

Read More

काँग्रेसचा 72 तासांचा विरोध दीड तासातच पाठिंब्यामध्ये बदलला:अंबादास दानवेंविरुद्ध उमेदवार देण्यावरून काँग्रेसची माघार

मविआतर्फे उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंनी लढण्यास विरोध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांपूर्वी बंडाचे संकेत दिले होते. मात्र, उद्धवसेनेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी सपकाळ, विजय वडेट्टीवारांना भेटले. त्यांच्यात दीड तास चर्चा झाली आणि ७२ तासांचा विरोध पाठिंब्यात बदलला. दोन वर्षांनंतर राज्यसभेची एक जागा मविआतर्फे काँग्रेसला मिळेल, अशी तडजोड काँग्रेसने स्वीकारली. यामुळे विधान परिषदेतील सर्व…

Read More

मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!

आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले. तेव्हाच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद या साऱ्याचा वापर करून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला. महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात लढा उभारला. तेव्हा आपल्याच सरकारने आपल्याच माणसांवर अक्षरशः गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे देशाला…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर:सोईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार, 248 जणांची तपासणी

शासकीय कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी ता २९ येथील नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ​जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते….

Read More

आमदार खोतकर यांची मराठी भाषा विद्यापीठाला भेट:प्रगतीची पाहणी करत यशस्वी वाटचालीस शुभेच्छा

विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान, विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष मोहन महाराज यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आमदार खोतकर यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मोहन महाराज यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांनी रिद्धपूर येथील…

Read More