Headlines

मुलगी झाल्यामुळे विवाहितेला तीन तलाक:नागपुरातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल; नेमका काय प्रकार घडला वाचा

मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला तीन तलाक दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या इतवारी – मस्कासाथ परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित महिलेचा 31 मे 2024 रोजी जाफरनगर येथील एलन व्हिला येथे इमरानसोबत मुस्लिम पद्धतीने विवाह झाला होता….

Read More

या आठवड्यात इराण-अमेरिका तणावावर गुंतवणूकदारांचे लक्ष:चौथ्या तिमाहीच्या निकालांसह 5 घटक दिशा ठरवतील; निफ्टीसाठी 24,500 वर रेझिस्टन्स

उद्या 11 मे पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल, अमेरिका-इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यांसारखे घटक बाजाराची दिशा ठरवतील. पुढील आठवड्यात बाजारात काय होऊ शकते, ते समजून घेऊया… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 23,936 | 23,870 | 23,820 | 23,466 | 23,335 | 22,858 सपोर्ट…

Read More

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते विसरले:वडिलांनीच सावत्र मुलाचा काटा काढला, घराशेजारीच रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून सूरज संजय गुरुमकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत सूरजचे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, परवा रात्री सूरजचा मृतदेह घराशेजारीच संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे सूरजचा मृत्यू झाल्याचा…

Read More

तळेगाव एमआयडीसी हादरली:8 व्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा अंत, तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक दृश्य काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे….

Read More

सुप्रिया सुळेंच्या अपघातावर सुनील मानेंकडून संशय:ज्यांचा अपघात झाला त्यांना शंका आली तर नक्कीच चौकशी होईल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. या अपघातावर सुनील माने यांच्याकडून शंका व्यक्त केली गेली आहे. सुनील माने म्हणाले, आमचे असे म्हणणे आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा…

Read More

राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही:मुख्यमंत्र्यांनी गृहखाते दुसऱ्याकडे सोपवावे; वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा मलीन- बजरंग सोनवणे

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले असून, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागणे ही भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अनेक खाती ठेवून घेतल्यामुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी हे खाते दुसऱ्याकडे सोपवायला हवे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तोफ डागली. बजरंग सोनवणे…

Read More

विनापरवाना शेतमाल खरेदी – विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई:फळे, भाजीपाल्यांत भेसळ करणाऱ्यांचीही खैर नाही, मंत्री जयकुमार रावल

राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. मात्र राज्यातील काही भागांत अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत….

Read More

आसाममध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील हिमंता:आमदार दलाच्या बैठकीत नेते निवडले गेले, 12 मे रोजी पदाची शपथ घेतील

आसामचे पुढील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असतील. रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हिमंता 12 मे रोजी सकाळी 11 वाजता तिसऱ्यांदा आणि भाजप नेते म्हणून सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 4 मे रोजी आलेल्या निकालांमध्ये भाजपने राज्यातील 126 पैकी 82 जागांवर दणदणीत विजय मिळवला…

Read More

बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादाराव केचे यांची सरकारकडे मागणी

लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, तर शेती पिकांना योग्य भाव मिळण्यासोबतच दर्जेदार निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे भाजप नेते दादाराव केचे यांनी म्हटले आहे. तर आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. दादाराव केचे म्हणाले…

Read More

अभिनेता विजय यांच्या शपथविधीत आई-वडील हात जोडून उभे होते:पहिल्यांदाच एका नेत्याने पँट, शर्टमध्ये शपथ घेतली, 6 मोमेंट्स

तमिलगा वेत्री कडगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यातून नेते बनलेले सी. जोसेफ विजय रविवारी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधीदरम्यान काही क्षण असेही होते जे चर्चेत राहिले. शपथपत्र न वाचता ते भाषण देऊ लागले, जसे त्यांनी ‘मी जोसेफ विजय…..’ असे म्हटले, समर्थकांनी 3 मिनिटे टाळ्या वाजवल्या. आई-वडील हात जोडून दिसले. यादरम्यान राज्यपालांनी त्यांना थांबवले. तामिळनाडूमध्ये शपथविधीचे…

Read More