Headlines

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक…

Read More

देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव:नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले- पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्या…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर:मोठ्या माशांना मोठ्या रकमा घेऊन अलगद बाहेर काढण्याचा प्रकार सुरू – रोहित पवार

भोंदू अशोक खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आलेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. या प्रकरणाच्या तपासातून त्यांची नावे वगळण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणातील मोठे मासे कोण? असा…

Read More

संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया…

Read More

वनीकरण विभागाची 'झाडाझडती'!:वृक्षारोपणातील गैरव्यवहारावरून जिल्हाधिकारी घेणार यंत्रणेची हजेरी, कागदपत्रांचीही होणार तपासणी

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांवरून आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून यंत्रणेची हजेरी घेतली जाणार आहे. या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वनीकरण विभागाचे गैरकारभार चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपन कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार…

Read More

संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM?:उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा संशय; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

छत्रपती संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या…

Read More

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील…

Read More

पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण:फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार

पुण्याच्या उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेची निर्घृण हत्या करून गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भानुदास भास्कर चौधरी या सासर्‍याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. सुनेला संपवून फरार झालेला हा आरोपी जळगावमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेमुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला आरोपीचा…

Read More

विजय यांचे कमल हासन आणि प्रकाश राज यांनी केले अभिनंदन:अभिनेत्री तृषा शपथविधीत सहभागी झाली, थलापतीच्या आई आणि बहिणीची गळाभेट घेतली

अभिनेता ते नेते बनलेले थलापती विजय यांनी रविवारी तमिळनाडूच्या ९व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित समारंभात राहुल गांधी आणि तृषा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांचे अभिनंदन केले. कमल हासन म्हणाले, ‘तमिळगा वेत्री कळगमचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माननीय…

Read More

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मे महिन्यात ₹14,231 कोटी काढले:2026 मध्ये आतापर्यंत ₹2 लाख कोटींची विक्री; कारण- जागतिक बाजारात अनिश्चितता

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPIs) माघार सुरूच आहे. जागतिक आर्थिक चिंतेमुळे या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ₹2 लाख कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल (NSDL) च्या आकडेवारीनुसार, केवळ मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत ₹14,231 कोटींची विक्री केली आहे. 2025 च्या तुलनेत या वर्षी अधिक दबाव 2026 या वर्षात आतापर्यंतची…

Read More