मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर 'क्रांतिकारी शेतकरी संघटने'चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा कर्जमुक्तीचा अध्यादेश समुद्रात फेकून देत तीव्र…